शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत आमचं अजून ठरलं नाही; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 20:15 IST

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा शिवसेनेचे नेते वारंवार देत असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप न सुटल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच किमान समान कार्यक्रम हे सूत्र ठेऊन राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार चालविण्यासाठी एकत्र येणार आहे असं चित्र निर्माण झालं. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीच्या बैठकीतच हा अंतिम निर्णय अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. 

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा शिवसेनेचे नेते वारंवार देत असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. अशातच पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांना एकत्र आणून सरकार बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या याबाबत काँग्रेसच्या नेत्यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यात नवीन समीकरण उदयास येणार की नाही हे ठरणार आहे असं सांगितलं. त्यामुळे अद्यापही राज्यातील सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय बाकीच आहे. 

शनिवारी ओला दुष्काळाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते एकत्ररित्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र ऐनवेळी काँग्रेस नेते मुंबईत उपलब्ध नसल्याने ही भेट रद्द करण्यात आली. बैठक रद्द होण्याचं कारण काँग्रेस नेत्यांनी वेगळं सांगितले असलं तरी याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तत्पूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलून अंतिम निर्णय होईल असं सांगितले आहे. उद्या याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. 

दरम्यान, काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा हे सोनिया गांधी यांच्या इच्छेविरोधात आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तयार केलं आहे. पण सोनिया गांधी या नवीन समीकरणामुळे नाराज असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणं आहे की, अद्यापही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील नवीन समीकरणाला मान्यता दिली आहे. अंतिम निर्णय अद्यापही बाकी आहे. तसेच काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे हेदेखील सोनिया गांधी यांना आवडलं नाही त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.   

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019