शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत आमचं अजून ठरलं नाही; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 20:15 IST

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा शिवसेनेचे नेते वारंवार देत असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप न सुटल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच किमान समान कार्यक्रम हे सूत्र ठेऊन राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार चालविण्यासाठी एकत्र येणार आहे असं चित्र निर्माण झालं. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीच्या बैठकीतच हा अंतिम निर्णय अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. 

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा शिवसेनेचे नेते वारंवार देत असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. अशातच पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांना एकत्र आणून सरकार बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या याबाबत काँग्रेसच्या नेत्यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यात नवीन समीकरण उदयास येणार की नाही हे ठरणार आहे असं सांगितलं. त्यामुळे अद्यापही राज्यातील सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय बाकीच आहे. 

शनिवारी ओला दुष्काळाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते एकत्ररित्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र ऐनवेळी काँग्रेस नेते मुंबईत उपलब्ध नसल्याने ही भेट रद्द करण्यात आली. बैठक रद्द होण्याचं कारण काँग्रेस नेत्यांनी वेगळं सांगितले असलं तरी याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तत्पूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलून अंतिम निर्णय होईल असं सांगितले आहे. उद्या याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. 

दरम्यान, काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा हे सोनिया गांधी यांच्या इच्छेविरोधात आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तयार केलं आहे. पण सोनिया गांधी या नवीन समीकरणामुळे नाराज असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणं आहे की, अद्यापही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील नवीन समीकरणाला मान्यता दिली आहे. अंतिम निर्णय अद्यापही बाकी आहे. तसेच काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे हेदेखील सोनिया गांधी यांना आवडलं नाही त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.   

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019