शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Maharashtra Government: शिवसेना, आघाडीच्या एकसूत्री कार्यक्रमाचा मसुदा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 06:26 IST

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे.

मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर तो जनतेपुढे मांडला जाईल. या ४० मुद्द्यांच्या अजेंड्यांत शेती, रोजगारनिर्मिती, दुष्काळ निवारण व उद्योगवाढीवर भर आहे.राष्टÑपती राजवट लागू असूनही सत्ता स्थापनेसाठी बैठका सुरू आहेत. बिगर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादीच्या समन्वय समितीची दहा तास बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे व विजय वडेट्टीवार, राष्टÑवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ व नसीम खान, तर शिवसेनेकडून सुभाष देसाई व एकनाथ शिंदे हजर होते.सरकारचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून किमान समान कार्यक्रमात वादग्रस्त मुद्दे टाळले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.राज्यात महापूर आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. शिवाय, बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणे, जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देणेआणि महिलांना स्वयंपूर्ण बनविणे, या बाबींना प्राधान्य देण्यात येईल, असे राष्टÑवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.>शरद पवार भेटणार सोनिया गांधींनाराज्यात सत्तास्थापनेला वेग आलेला असतानाच राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर पद आणि जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधी