शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: शरद पवारांनी पुन्हा टाकला 'बॉम्ब'; म्हणाले, 'सत्तास्थापनेचं भाजपा-शिवसेनेला विचारा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 12:23 IST

शरद पवार आज दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी महाशिवआघाडीच्या सरकारबद्दल सूचक विधान केलं आहे.

मुंबईः विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला जनतेनं स्पष्ट बहुमत देऊनही त्यांना अद्याप सरकार स्थापन करता आलेलं नाही. मुख्यमंत्रिपदावरून दोघांचं घोडं असलं असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठकाही सुरू आहेत. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच खातेवाटप आणि इतर पदांबाबत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत सहमती होणे बाकी आहे, तसेच काँग्रेसबाबतचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याने सरकार स्थापनेस विलंब होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी महाशिवआघाडीच्या सरकारबद्दल सूचक विधान केलं आहे.पत्रकारांनी शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत. “काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे. संध्याकाळी सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचंही पवारांनी सांगितलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवणार आहे, असं शिवसेना म्हणत असल्याचं त्यांना विचारल्यावर त्यांनी उपरोधिका प्रतिसाद दिला. शिवसेनेसोबत सरकार बनवणार का याचं उत्तर शिवसेनेलाच विचार, असं म्हणत ते निघून गेले.  त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाशिवआघाडीमध्ये सरकार स्थापण्यावरून चर्चा सुरू असून, पवारांनी असं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून, सरकार चालविण्यासाठी 40 कलमी किमान समान कार्यक्रम निश्चित करून तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडे पाठविला आहे. आता शरद पवार हे स्वत: सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेला सरकारसाठी पाठिंबा देण्याची भूमिका सोनिया गांधी यांनी घ्यावी, यासाठी पवार त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतील, असे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे राज्यातील नेते याबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी सातत्याने चर्चा करीत आहेत. काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यास हे सरकार टिकेल, अशी अट राष्ट्रवादीने घातली होती. त्यासाठीच पवार आधी ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी व नंतर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील.>मुख्यमंत्रिपद सेनेकडेचशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचे खातेवाटपावर जवळपास एकमत झाले असून, 5 वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार असून, सेनेला 16, राष्ट्रवादी 14 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. शिवाय नगरविकास व अर्थ शिवसेनेकडे, गृहखाते राष्ट्रवादी तर महसूल काँग्रेसकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.>आठवडाभरानंतरच चित्र स्पष्ट होणारआणखी किमान आठवडाभर तरी सत्ता स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होणार नाही. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाची सहमती, मंत्रिपदे व महामहांडळांसह अन्य पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अंतिम सहमती होण्यास वेळच लागणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस