शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 23:58 IST

विदर्भात एकूण ६२ जागा आहेत त्यातील १२-१४ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. १२-१४ जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी कशाला म्हणायची..? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला. 

चिपळूण - महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यात राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीत आहेत तर इथं ठाकरे गट आणि शरद पवारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. विदर्भातील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यात ठाकरे गटाचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी काँग्रेसला जुन्या गोष्टींची आठवण करून देत जास्त ताणलं तर तुटूही शकते असा सल्ला दिला आहे. 

भास्कर जाधव म्हणाले की, काही लोकांची प्रवृत्ती, कार्यपद्धती असते, माझं ते माझं आणि तुझं तेही माझं... माझ्याकडे पूर्व विधानसभा क्षेत्र आहे, त्यात २८ विधानसभेच्या जागा आहेत. त्यात २०१९ च्या निकालात १४ काँग्रेस राष्ट्रवादीकडे आणि १४ भाजपा शिवसेनेने जिंकल्या आहेत. त्यामुळे १४ जागांवर आमचा हक्क आहे. परंतु त्यातील ८ ते १० जागा आम्ही मागितल्या आहेत. मित्रपक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे जागावाटपाचं घोडं अडलं आहे. महाविकास आघाडी तुटावी अशी शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची अजिबात इच्छा नाही. सर्वांनी मिळून तुटेपर्यंत ताणू नका असं त्यांनी सांगितले आहे. परंतु एका बाजूने आपण उभे राहिलो आणि दुसऱ्या बाजूने सातत्याने ताणत असेल, मी जागेवर राहिलो, ताणलं नाही आणि कुणीतरी दुसऱ्या बाजूने ताणत असेल तर तुटूही शकते. विदर्भात एकूण ६२ जागा आहेत त्यातील १२-१४ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. १२-१४ जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी कशाला म्हणायची..? १२ ते १४ जागा आम्हाला मिळाव्यात त्यातील पूर्व विदर्भात ८ जागा मिळाव्यात असा माझा आग्रह आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच आघाडी आणि युती होतच राहतील परंतु पक्ष टिकला पाहिजे. जर कुणाला वाटत असेल एखादा पक्ष अडचणीत आहे, तर त्याचा फायदा घेऊन या पक्षाला अधिक अडचणीत आणावा असा कुणाचा मनसुबा असेल, कुणाच्या मनात हेतू दडलेला असेल तर प्रत्येकाला आपापला पक्ष टिकवण्याचा आणि वाढवण्याचा अधिकार आहे. लोकसभेनंतर काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत गेला असं वाटत असेल तर २०१९ ला काँग्रेस छोट्या भावाच्या भूमिकेत होता हे मान्य करावे लागेल. १ जागा आली होती, ती खासदाराच्या निधनानं रिक्त झाली त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस झीरो होती. आता ती जर मोठी झाली असेल तर २०१९ चा फॉर्म्युला बघावा लागेल. २०१९ ला काँग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर होती. त्यामुळे उद्या काय होईल यापेक्षा आता डोळ्यासमोर परिस्थिती काय हे प्रत्येकाने घेऊन पुढे चालले पाहिजे असा सल्ला आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे.

दरम्यान, जागावाटपाचा तिढा महाराष्ट्रातील नेत्यांसोबत सुटणार कसा, हा तिढा दिल्लीतील नेत्यांसमोर बसून सुटायला हवा होता. परंतु ते न झाल्याने हा तिढा सुटलेला नाही. एकीची ताकद असते, पण एकीची महत्त्व ज्यांना कळत नाही त्यांना काळ हे उत्तर असते. जे काही चाललंय याचा फायदा विरोधकांना होतोय का, विरोधकांची आयती पोळी भाजली जाईल का...राज्यातील जनतेने हे सरकार उलथवून टाकण्याचं ठरवलं आहे हे आम्हाला मान्य आहे की नाही. जनतेच्या भावनेचा आदर करायचा की नाही हे वाद घडवू पाहतायेत त्यांनी ठरवायचं आहे असा अप्रत्यक्षपणे भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांवर प्रहार केला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBhaskar Jadhavभास्कर जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४