शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 06:27 IST

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी सर्व प्रकारच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी सकाळपासून मतदारसंघातील विविध वॉर्डमध्ये उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांचा जल्लोष सुरू होता.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वच उमेदवारांनी गाजवला. त्यामुळे दिवसा मतदारसंघांमध्ये प्रचार फेऱ्यांचा धूमधडाका आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांद्वारे मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक प्रचार, असे चित्र सुटीच्या दिवशी पाहायला मिळाले. सुटीचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांचे आपल्याकडे ‘लक्ष’ वेधण्यात उमेदवारांना यश आल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी सर्व प्रकारच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी सकाळपासून मतदारसंघातील विविध वॉर्डमध्ये उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांचा जल्लोष सुरू होता. या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना या फेऱ्यांमध्ये सामील करून घेण्यात आले होते. यामध्ये काही उमेदवार प्रचार फेरीसोबतच चाळी आणि झोपडपट्ट्यांच्या गल्ल्यांमध्ये फिरून मतदारांशी थेट संपर्क साधताना दिसले. तर काही गृहसंकुलांच्या चौकामध्ये आणि मैदानामध्ये उभे राहून इमारतींमधील सर्व रहिवाशांना मतदानाचे आवाहन करत होते. दुसऱ्या बाजूला दिवसभर प्रचार रथांच्या माध्यमातून ध्वनी चित्रफितींद्वारे मतदानाचे आवाहनही उमेदवारांकडून करण्यात आले.

दरम्यान, एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने मतदारसंघातील समविचारी मतदारांना आम्ही यापूर्वीच भेटलो असून, अखेरच्या दोन दिवसांत सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

समाजनिहाय प्रचारावर भर 

प्रत्येक उमेदवारांकडून मतदारसंघांमध्ये मराठी भाषिक, उत्तर भारतीय, अल्पसंख्याक तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांना हेरून त्या-त्या समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विविध विकासकामांसोबतच मंदिर आणि समाज मंदिरांच्या उभारणीचे आश्वासनही देण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांची लगबग कोणत्याही परिस्थितीत मतदारांनी घराबाहेर पडावे आणि आपल्यालाच मतदान करावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, अशा सूचना राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी आपआपल्या बुथप्रमुखांना दिल्या आहेत. त्यानुसार हे कार्यकर्ते रविवारी दिवसा प्रचार फेरीत आणि संध्याकाळी मात्र आपापल्या बूथमधील मतदारांशी घरोघरी जाऊन थेट संपर्क साधताना दिसत होेते. मतदान किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी