शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र निवडणूक २०१९: बंद पडलेले ईव्हीएम बदलण्यास लागतोय वेळ; यंत्रणा ठरतेय कुचकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 1:10 PM

सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही मतदान केंद्रांवर याचवेळी ईव्हीम सुरू झाले नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाला आज सुरूवात झाली असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाला अपयश येत आहे. पावसाने रिपरिप सुरू ठेवलेली असताना मतदार राजाने पाठ फिरविली आहे, मात्र ईव्हीएम बिघाडही तेवढाच कारणीभूत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे आदित्या ठाकरे लढवत असलेल्या वरळीत तर दोन तासांपासून नव्या ईव्हीएमच्या प्रतिक्षेत मतदार ताटकळले आहेत.

सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही मतदान केंद्रांवर याचवेळी ईव्हीम सुरू झाले नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तर एका केंद्रावर केवळ एक मत पडले असताना ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. बंद पडलेले मतदान यंत्राची तक्रार करून दुसरे पर्यायी यंत्र मागविण्यामध्ये तास ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. क्कलकुवा मतदारसंघातील त्रिशुल ता़ धडगाव  येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तब्बल 5 किमी दगड गोट्यांमधून पायपीट करून मतदान यंत्र पोहोचविण्यात आले आहे. 

तर वणी विधानसभा मतदार संघातील नांदेपेरा येथील मतदान केंद्र क्रमांक ५५ वरील मतदान यंत्र दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक बंद झाले. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. आता नवीन मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू असून त्यालाही दीड तास लागतील, असे मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पांढरकवडा(यवतमाळ) येथील नगर परिषद उर्दु शाळा केंद्रावर मतदान यंत्र काम करत नव्हते. त्यामुळे जवळपास अर्धा तास मतदान खोळंबले होते. त्यानंतर यंत्र दुरूस्त करण्यात आले.

अशा प्रकारे मतदान यंत्रे बंद पडत असल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये संतापाचे वातावरण असून बरेचजण मतदान न करताच माघारी परतत आहेत. तर नांदेपेरा येथील मतदान यंत्र बंद पडल्याने महिला मतदारांनी मतदान केंद्राच्या व्हरंड्यात ठिय्या दिला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019EVM Machineएव्हीएम मशीन