शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

Maharashtra Election 2019 : पहिलवानांच्या आखाड्यात किन्नरांची उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 5:39 AM

विधानसभा निवडणुकीचे रण तापले असतानाच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

- धनंजय वाखारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पहिलवान आणि नटरंगच्या वादात आता किन्नरांनी उडी घेतली असून, राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शी येथील जाहीर सभेत केलेल्या हातवाऱ्यांबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. निवडणुकीत अशाप्रकारे हीन पातळीवर होणारा प्रचार वेदनादायी असून, महाराष्टÑाच्या संस्कृतीला ते शोभत नाही. हा तर विचारसंहितेचाच भंग आहे. आमच्यात शिवाची शक्ती असून, त्यापुढे पुरुष आणि स्री हे दोन्हीही येत नसल्याची भावना किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल गुरु यांनी ‘लोकमत’शी बोलून दाखविली आहे.

विधानसभा निवडणुकीचे रण तापले असतानाच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विरोधक थकले आहेत, आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच उरले नाही’ अशी टीका विरोधकांवर केली. त्याला प्रत्युत्तर राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बार्शी येथील जाहीर सभेत दिले. शरद पवारांनी ‘लढाई पैलवानांमध्ये होते, या ‘अशांशी’ नाही हे वाक्य बोलताना विशिष्ट प्रकारचे हातवारे केले होते. पवारांचे हे हातवारे भाजपला झोंबल्यानंतर रविवारी जळगावमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा उत्तर दिले. ‘आम्ही नटरंगसारखे काम केले नाही. आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येते, पण आम्ही देणार नाही’ असे सांगत शरद पवार यांना टोला लगावला. निवडणुकीत पैलवान विरुद्ध नटरंग असा सामना रंगला खरा; परंतु त्याला आता किन्नरांनी आक्षेप घेत खालच्या पातळीवर जाऊन घसरलेल्या राजकारणाबद्दल नापसंती दर्शविली आहे. रविवारी कोजागरी पौर्णिमेनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडावर छबिना उत्सवानिमित्त देशभरातील शेकडो तृतीयपंथी एकत्र आले आहेत. त्यावेळी किन्नरांच्या महंत पायल गुरू यांनी राजकारणात किन्नरांना ओढल्याबद्दल संताप व्यक्त केला. राज्यातील प्रगल्भ म्हणविणाºया राजकारण्यांकडून अशा प्रकारचे हातवारे अथवा विधाने अपेक्षित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.अचूक पडली ठिणगी...निवडणुकीतील पहिलवान-नटरंग या वादामुळे पुन्हा एकदा नटरंग सिनेमातील गीतांनाही उजाळा मिळाला आहे. निवडणुकीत घसरलेली ही हीन पातळी लक्षात घेता, नटरंग सिनेमातील ‘अचूक पडली ठिणगी, पेटलं सारं रान, काळ येळ इसरलं गडी, ºहाईलं न्हाई भान, चढू लागला रंग, दंग सारी दिनरात, पर मधेच शिंकली माशी, झाला की हो घात’ या गीताच्या ओळींबरोबरच ‘खेळ मांडला’ या गीतांचा आधार घेत पवारांवर सोशल मीडिया मात्र तुटून पडली आहे.लोकशाहीत प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे; परंतु दुसºयांच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. निवडणुकीत ज्या प्रकारे आरोप-हातवारे सुरू आहेत, ते महाराष्टÑाच्या संस्कृतीला शोभेसे नाही. हा विचारसंहितेचाच भंग आहे. आमच्यात तर शिवाची शक्ती आहे. आमच्यापुढे पुरुष आणि स्री दोन्हीही येऊ शकत नाही. राजकारणाच्या या लढाईत माणूसधर्माला प्राधान्य द्या, त्यामुळे देशाचे भले होईल.- पायल गुरु, महामंडलेश्वर, महाराष्टÑ किन्नर आखाडा