शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 13:06 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती वैगेरे असं नव्हतं. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. यंदाच्या निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारक असतील. लोकांचा प्रतिसाद पाहता हे घडू शकतं असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी माध्यमाशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, गेले काही वर्षात माझ्या पक्षात बऱ्याच घडामोडी घडल्या, सत्तेच्या काळात असणारे नेते सत्ता नसताना सोडून गेले, सत्तेशिवाय न राहण्याची स्थिती आल्यामुळे नेत्यांच्या मनात चलबिचल झाली. असे नेते सत्ताधारी पक्षात गेले. पक्षांतर केलेल्यांपैकी काही ५-१० नेते सोडले तर इतरांना संधी मिळाली नाही. या नेत्यांचा वापर करुन घेतला. एखादी व्यक्ती ४-५ आमदारांना निवडून आणणार असतील तर त्याला किंमत दिली जाते. नंतर हळूहळू त्यांना बाजूला सारुन दिलं जातं असं त्यांनी सांगितले. 

तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती वैगेरे असं नव्हतं. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता, आज स्थिती तशी नाही, येतंय त्याला घ्या अशी स्थिती आहे. जे येत नसतील त्यांना सत्तेचा गैरवापर करुन पक्षात घेतलं जातं असा आरोप शरद पवारांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसने कलम ३७० ला विरोध केला नाही तर स्थानिक जनतेला, नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. मात्र ती मागणी करण्याची भूमिका घेतली म्हणून डुब मरो असं पंतप्रधान बोलतात हे योग्य नाही, देशाच्या पंतप्रधनांना १० सभा घ्याव्या लागतात, गृहमंत्री अनेक जिल्ह्यात सभा घेत फिरतायेत मग विरोधक कसे दिसत नाहीत? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. 

त्याचसोबत २०१४ च्या निवडणुकीत मी उभा होतो का? मी १४ वेळेला लोकसभा, राज्यसभा निवडणुका लढविल्यानंतर मी निर्णय घेतला निवडणुकीत उभं राहायचं नाही. तरुणांना संधी देण्याची भूमिका घ्यायला हवी. राज्य सहकारी बँकेतील कर्ज देण्यासाठी मी शिफारस पत्र लिहिले आहे, पत्र दिलं आहे. मग ते दाखवा असंही आवाहन शरद पवारांनी केलं आहे. 

वीर सावरकरांना भारतरत्न देण्यात गैर नाही  वीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचाराला विरोध आहे मात्र त्यांनी विज्ञानवादी विचारांना चालना दिली. त्याबद्दल त्यांना भारतरत्न देणं काय गैर वाटत नाही. त्यांनी विज्ञानवादी विचार लोकांमध्ये मांडले. वीर सावरकरांचे नेतृत्व भाजपाने कधी मानलं नव्हते. जनसंघ असो वा भाजपा स्थापनेपासून इतिहास आठवलो, तर सावरकरांच्या हिंदू महासभेला जनसंघाचा पाठिंबा नव्हता. आज ते भूमिका मांडत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी ज्याचा ज्याचा वापर करता येईल ते सगळं भाजपा करत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी