शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

'हीच ती वेळ' म्हणणाऱ्या शिवसेनेची नवी टॅगलाईन ठरली; भाजपाची डोकेदुखी वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 19:08 IST

हातात हात घालून निवडणूक लढवणारे भाजपा आणि शिवसेना हे भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत.

ठळक मुद्देशिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, आपण मागे हटणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय.भाजपाने त्यांचं पत्र घेऊन यावं, जे ठरलं होतं, ते मान्य करावं, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली.यावेळी कोणत्याही पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईः विधानसभा निवडणूक निकालाला आठवडा उलटून गेल्यानंतरही राज्यात सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरायला तयार नाही. हातात हात घालून निवडणूक लढवणारे भाजपा आणि शिवसेना हे भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत. एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहे. राजकीय वर्तुळात वेगवेगळी गणितं जुळवली जात आहेत. अशातच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, आपण मागे हटणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय. आत्तापर्यंत 'हीच ती वेळ', असं म्हणणारी शिवसेना आता आणखी पुढे जाऊन, 'आत्ता नाही तर कधीच नाही', अशा पवित्र्यात असल्याचं राऊत यांनी 'एबीपी माझा'वरील कार्यक्रमात स्पष्ट केलं. आम्ही शांतपणे बसलोय, सरकार कधी स्थापन होतं याची वाट बघतोय, आमच्याकडे जनादेश नाही, सर्वात मोठा पक्ष म्हणून ती भाजपाची जबाबदारी आहे, अशी भूमिका घेत त्यांनी भाजपावर दबाव आणखी वाढवलाय.

...तर मग उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायचा विचार करावा; आठवलेंनी सुचवले

'मुख्यमंत्र्यांच्या वाक्याने राग येतो; मग भाजपाबद्दल वाईट अग्रलेख लिहिलेत त्याचं काय?'

शिवसेना युतीधर्माचं पालन करत आहे. आमच्या ६३ लोकांच्या पाठिंब्याची गरज असेल तर तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे. पाठिंब्याचं पत्र द्यायलाही आम्ही तयार आहोत, असं सांगतानाच, भाजपाने त्यांचं पत्र घेऊन यावं, जे ठरलं होतं, ते मान्य करावं, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली. एरवी निकालानंतर लगेच भाजपा सत्तास्थापनेचा दावा करते. हरयाणातही त्यांनी ७२ तासांत सगळं जुळवलं. मग इथेही त्यांनी सरकार स्थापनेसाठी पुढे यायला हवं, असं त्यांनी डिवचलं. त्याचवेळी, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊन यावेळी कोणत्याही पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. 

'फिफ्टी-फिफ्टी'साठी अडून बसलेल्या शिवसेनेला छगन भुजबळांचा मोलाचा सल्ला!

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  यांनी ठरवलं आहे. भाजपाच्या हायकमांडने तसा शब्दही दिला होता. तो त्यांच्याकडून पूर्ण होत नसेल तर आम्ही कोणत्याही संघर्षाला तयार आहोत, पण मुख्यमंत्री करणारच, असं खासदार राऊत यांनी ठामपणे सांगितलं. मात्र, मुख्यमंत्री कोण असेल आणि तो कुणाच्या पाठिंब्यावर बसेल, यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं. तरुणांनी नेतृत्व करायला हवं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य यांनाच पसंती दर्शवली आहे.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांना गुरू मानतात. मग, मी त्यांना भेटलो, आघाडीचं सरकार कसं चालतं याबद्दल त्यांचा सल्ला घेतला तर कुठे बिघडलं?, असा सूचक प्रश्न त्यांनी केला. 

'आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपने बहुमत सिद्ध करावेच'

भाजपच्या आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश

मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षं वाटून घेण्याबाबत काहीही ठरलेलं नव्हतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे खोटं बोलताहेत असा संदेश जातोय आणि ते चुकीचं आहे. त्यामुळेच त्या विधानाने दुःख झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेने भाजपापुढे कधीच माघार घेतलेली नाही. युतीचा प्रस्ताव घेऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते. देशहिताच्या मुद्द्यावर त्यांनी मदतीचा हात मागितल्यानं, मनात शंकेची पाल चुकचुकत असतानाही त्यांना एक संधी देण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं स्पष्ट करत राऊत यांनी भाजपावर शरसंधान केलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा