शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: ज्याच्या सोबत 'संदेश' असतो तोच आमदार बनतो; नितेश राणेंच्या आमदारकीचे गुपित उघड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 13:28 IST

पारकर गट आणि राणे समर्थकांमध्ये विळ्या भोपळ्याचे नाते आहे. यामुळे पारकर यांनी या माघारीवरून भावनिक पोस्ट केली आहे.

मुंबई : राज्यभरात भाजपा-शिवसेनेची युती असताना तळकोकणात मात्र एकाच मतदारसंघात दोन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नारायण राणेंचा मुलगा आणि माजी आमदार नितेश राणे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच भाजपात प्रवेश केला. तर त्याचवेळी भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी बंड करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्या दिवशी नारायण राणेंचे उजवे हात समजले जाणारे सतीश सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. यामुळे पारकर यांनी माघार घेत सावंत यांनाच युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करून टाकले. 

पारकर गट आणि राणे समर्थकांमध्ये विळ्या भोपळ्याचे नाते आहे. यामुळे पारकर यांनी या माघारीवरून भावनिक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी नितेश राणे हे कसे आमदार झाले याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. श्रीधर नाईक यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर १९९१ साली २४ वर्षांचा संदेश पारकर पहिल्यांदा कणकवलीचा सरपंच झाला. गेल्या 28 वर्षांत संदेश पारकरने मार खाल्ला. मार दिला. संघर्ष केला. कोर्टात केला, रस्त्यावर केला, निवडणुकीत केला. तो संघर्ष एका व्यक्तीविरोधात नव्हता तर एका प्रवृत्तीविरोधात होता. ते सुधारले असतील असे मला वाटले होते. मी त्यांच्याशी काही काळ मैत्री केली हे खरे आहे. पण कडू कारले साखरेत घोळले तरी ते कडूच राहणार, हे माझ्या लक्षात आले नाही ही माझी चूक आहे, हे मान्य. त्या प्रवृत्ती सुधारल्या नाहीत, असे शल्य असल्याचेही पारकर यांनी म्हटले आहे. 

या काळात पारकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास केला. यावेळी ज्या ज्या उमेदवारांसोबत संदेश पारकर होता तो आमदार झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. हे खरेही आहे. प्रमोद जठार हे देखील आपल्यामुळेच आमदार झाल्याचा दावा पारकर यांनी करताना 2014 मध्येही तेच आमदार झाले असते असे पारकर यांनी म्हटले आहे. परंतू मी तेव्हा नितेश सोबत असल्याने आमदारकीची माळ नितेशच्या गळ्यात पडल्याचा खुलासा पारकर यांनी केला आहे. 

आज निवडणूक तोंडावर असताना ज्या राणेंनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यायला हवा, त्याच पक्षाने राणेंचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. आज संघ आणि मोदी भाजप की राणे भाजप, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्या भाजपचे कार्यकर्ते मार खातील, पदावरून जातील आणि तिथे राणेंचे टगे कार्यकर्ते असतील, असा इशारा त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. 

भाजपाच्या निष्ठावंत घराण्यावर अंडी फेकली

देवगडात भाजपच्या निष्ठावंत घराण्यावर अंडी मारली. सावरकरांवर वाईट भाषेत टीका केली. बाबासाहेब पुरंदरेंना शिव्या दिल्या. संघावर चिखल उडवला. नोकरशहांवर दहशत माजवली. कुणी कणकवली तालुक्यात येणार नाही याची सोय केली. जठार त्या गोष्टी विसरले असतील. पण संघाच्या शिस्तीत वाढलेला कडवट कार्यकर्ता त्या गोष्टी कधीच विसरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Nitesh Raneनीतेश राणे Sandesh Parkarसंदेश पारकरPramod Jatharप्रमोद जठारBJPभाजपाShiv Senaशिवसेना