शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 16:29 IST

'शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही.'

ठळक मुद्देशिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ नये, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असंही आठवले यांनी नमूद केलं आहे.

भाजपाने सरकार स्थापन करण्यास नकार दिला असला आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा महाशिवआघाडी अस्तित्वात येण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अजूनही प्रचंड आशावादी आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ नये, असं आवाहन करत त्यांनी दोन्ही भावांना मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला सुचवला आहे.   

शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही. त्यांच्यासोबत जाऊन अल्पकाळ टिकणारं सरकार स्थापन करण्यापेक्षा सेनेनं भाजपासोबतच राहावं. साडेतीन वर्षं भाजपाचा मुख्यमंत्री आणि दीड वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री, असं वाटप करून दोघांनी आपापसातील वाट मिटवावा, असं रामदास आठवलेंचं म्हणणं आहे. शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेत ते महायुतीमुळे आलेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी लढून निवडून आलेत. असं असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात करू नये, अशी आग्रही सूचना त्यांनी केलीय.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये महत्वपूर्ण भेट; शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार?

भाजपाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात? अजित पवारांना केला फोन 

शिवसेनेनं काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नये, हे सांगतानाच, काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असंही आठवले यांनी नमूद केलं आहे. सेनेसोबत गेल्यास, धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून असलेला काँग्रेसचा जनाधार धोक्यात येऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. अर्थात, आठवलेंचा हेतू चांगला असला, तरी आजची राजकीय स्थिती पाहता तो प्रत्यक्षात येणं कठीणच दिसतंय.

शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

भाजपाच्या मित्रपक्षांची अवस्था म्हणजे 'इकडं आड तिकडं विहीर'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून आग्रही भूमिका घेतल्याने भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यानंतर, राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या पार्श्वभूमीवर, आज सकाळपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी आणि बैठका सुरू आहेत. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं शिवसेना रालोआमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा