शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 16:29 IST

'शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही.'

ठळक मुद्देशिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ नये, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असंही आठवले यांनी नमूद केलं आहे.

भाजपाने सरकार स्थापन करण्यास नकार दिला असला आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा महाशिवआघाडी अस्तित्वात येण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अजूनही प्रचंड आशावादी आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ नये, असं आवाहन करत त्यांनी दोन्ही भावांना मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला सुचवला आहे.   

शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही. त्यांच्यासोबत जाऊन अल्पकाळ टिकणारं सरकार स्थापन करण्यापेक्षा सेनेनं भाजपासोबतच राहावं. साडेतीन वर्षं भाजपाचा मुख्यमंत्री आणि दीड वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री, असं वाटप करून दोघांनी आपापसातील वाट मिटवावा, असं रामदास आठवलेंचं म्हणणं आहे. शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेत ते महायुतीमुळे आलेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी लढून निवडून आलेत. असं असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात करू नये, अशी आग्रही सूचना त्यांनी केलीय.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये महत्वपूर्ण भेट; शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार?

भाजपाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात? अजित पवारांना केला फोन 

शिवसेनेनं काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नये, हे सांगतानाच, काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असंही आठवले यांनी नमूद केलं आहे. सेनेसोबत गेल्यास, धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून असलेला काँग्रेसचा जनाधार धोक्यात येऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. अर्थात, आठवलेंचा हेतू चांगला असला, तरी आजची राजकीय स्थिती पाहता तो प्रत्यक्षात येणं कठीणच दिसतंय.

शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

भाजपाच्या मित्रपक्षांची अवस्था म्हणजे 'इकडं आड तिकडं विहीर'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून आग्रही भूमिका घेतल्याने भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यानंतर, राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या पार्श्वभूमीवर, आज सकाळपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी आणि बैठका सुरू आहेत. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं शिवसेना रालोआमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा