शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

Maharashtra Election 2019 : राजकीय आखाड्यात खडाखडी; आरोप-प्रत्यारोपाने उडाला धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 06:13 IST

भाजपने पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकांचा प्रचार टिपेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे वातावरण ढवळून निघत आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी गांधी-पवार कुटुंबावर जोरदार टीका केली, तर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘कलम ३७०’ वरून भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. आम्हाला साधेभोळे समजू नका, असा इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांना दिला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत आम्ही उघड्यावर लढणारी माणसं आहोत, ही मॅच मी जिंकली आहे, असे वक्तव्य केले.

दरम्यान, भाजपने पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेने मात्र आपल्या बंडखोरांवर कारवाईचा बडगा न उगारल्यामुळे युतीत नाराजीचे चित्र आहे. काँग्रेसचे राजकारण गांधी परिवाराशिवाय पुढे जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला. भाजपमध्ये घराणेशाही नाही. घराणेशाही मुळात फोफावली केवळ गांधी, पवार कुटुंबामुळेच, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ते धारणी (अमरावती) येथील प्रचारसभेत बोलत होते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मौनीबाबा अशी संभावना करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. शेजारी राष्ट्राच्या हल्ल्याविरुद्ध चकार शब्द न काढणाऱ्या पक्षाला देशाने हद्दपार करून राष्ट्रहित जोपासणाºया नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून राष्ट्रवाद मजबूत केल्याचा दावा शहा यांनी केला.नाणारला शिवसेनेचा विरोधचकोकणातील जनतेची भावना जाणून नाणार रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला आहे. भविष्यातदेखील हा प्रकल्प कदापीही होऊ देणार नाही, असे सांगतानाच महाराष्ट्रामध्ये झालेली कर्जमाफीही शिवसेनेच्या भूमिकेमुळेच झाली आहे. यापुढील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून महाराष्ट्रातील शेतकºयांना कर्जमुक्त करणार, असा दावा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी वळीवंडे येथील प्रचारसभेत केला.मी मॅच जिंकली आहे-उद्धवआम्ही बंद हॉलमधली माणसं नाही. उघड्या मैदानात लढणारी माणसं आहोत. बोलतो, पाहतो, करतो असं बोलणारी शिवसेना नाही. जे बोलतो ते करतो. मी मॅच जिंकलेली असून माझी धावसंख्याही ठरलेली आहे, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावती येथे केला.काश्मीरमध्ये कोण शेती करणार - पवारनिवडणूक महाराष्टÑ विधानसभेची आणि भाजपाचे नेते ३७० कलमावर मतं मागत आहेत. अमित शहा म्हणत असतील की आता काश्मीरमध्ये शेती शक्य आहे. मला सांगा इथले घरदार सोडून काश्मीरमध्ये कोण शेती करायला जाईल? अशी विचारणा शरद पवार यांनी केली. कुणी मुद्द्याचं बोलतच नाही. महागाई, शेतकºयांचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, ढासळती अर्थव्यवस्था यावर बोला की, असा टोलाही पवारांनी लगावला.भाजपचा शिवसेनेला इशाराआम्ही साधे-भोळे आहोत, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, भलेभलेही आम्हाला घाबरतात. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी युतीधर्म पाळावा आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांचा प्रचार करावा, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा चंद्रकांत पाटील दिला. मंडलिकांनी सोयीचे राजकारण संपवावे. कारण शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात आठ जागा जिंकायच्या आहेत, याची आठवणही पाटील यांनी करून दिली. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, हे लक्षात असू द्या, असा दमच त्यांनी दिला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्र