शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : 'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 11:21 IST

दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आता पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर निशाणा साधला आहे. 'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली' असं म्हणत सत्तास्थापनेवरुन जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना टोला लगावला.अण्णा हजारे यांचा आंदोलनादरम्यानचा झोपलेला एक फोटोही पोस्ट केला आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू असून लवकरच सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची दाट शक्यता आहे. दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आता पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईल. याच दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर निशाणा साधला आहे. 

'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली' असं म्हणत सत्तास्थापनेवरुन जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे. आव्हाड यांनी गुरुवारी (21 नोव्हेंबर) आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून 'अण्णा उठा कामाला लागावे लागेल, रामदेव बाबा आहेत तयार, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली' असं ट्वीट केलं आहे. यासोबतच त्यांनी अण्णा हजारे यांचा आंदोलनादरम्यानचा झोपलेला एक फोटोही पोस्ट केला आहे.

भाजपासोबत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. या तिन्ही पक्षांमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीदेखील हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता तीन पक्षांची मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा होईल. यानंतर त्यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागेल.

प्रज्ञा सिंह यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान दिल्याने पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रज्ञा सिंह यांच्यासह पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले आहे. जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, माझ्या शापामुळे हेमंत करकरेंचा मृत्यू झाला या प्रज्ञा सिंह ठाकूरच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके नाराज झाले की त्यांनी रागाच्या भरात प्रज्ञा सिंह यांना शिक्षा म्हणून संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीत स्थान दिलं असं म्हणत भाजपाच्या या भूमिकेवर टीका केली आहे.

पेरीयार रामास्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक दहशतवादी म्हणणाऱ्या रामदेवबाबांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. देशात ज्या काळामध्ये चातुर्वर्ण्य मनुवाद्यांची वर्णव्यवस्था समाजाला पोखरत होती, त्या काळात या दोन महानायकांनी त्यांच्याविरूद्ध लढा दिला. रामदेवबाबांना बाबा कोण म्हणतं, हे मला माहीत नाही. त्यांनी माफी मागावी, असे आव्हाड म्हणाले.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडanna hazareअण्णा हजारेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस