शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

Maharashtra Election 2019: शाळेमध्ये पोरालां फटकारलं की तो बापाला घेऊन यायचा; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 19:28 IST

Maharashtra Election 2019: आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत.

विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरु झाला असून काही दिवसांवर मतदान आलं आहे. पण निवडणुकीत मजाच येत नाहीए, कारण समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. यावर कोणी विरोधकच समोर नसल्याचे मुख्यमंत्री म्हणताय मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आखाडा खोदायला येताय का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.  

अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यातील उद्योगधंदे आलेले असताना सरकार याकडे दुर्लक्ष करते आज युवकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे, तरी देखील राज्य सरकार गाफील आहे. तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्राची स्वप्न लोकांना दाखवण्यात आली होती, मात्र या माध्यमातून नोकरी कोणालाच उपलब्ध झाली नसल्याची टीका त्यांनी भाजपा सरकारवर केली. त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं चांगला भाव मिळेल, मात्र सरकारकडून निर्यातीवर बंदी घालून पाकिस्तानमधून कांदा आयात करायला सुरुवात केली असल्याचे देखील अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितले. सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी देशाच्या पंतप्रधानांना दहा सभा तर गृहमंत्री अमित शहांना वीस सभा घ्यावा लागतात. यामध्येचं भाजपा सरकारचे अपयश दिसून येतं असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शाळेमध्ये एखाद्या पोरालां फटकारलं की तो पोरगा बापाला शाळेत घेऊन यायचा, अशीच परिस्थिती मुख्यमंत्र्यांवर आली तर नाही ना? असा टोला देखील अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsinnar-acसिन्नरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा