शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
१५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
5
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
6
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
7
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
8
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
9
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
10
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
11
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
12
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
13
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
14
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
15
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
16
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
17
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
18
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
19
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
20
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 17:30 IST

वैजापूर विधानसभा निवडणूक २०१९ - मी बोलण्यासाठी नाही आलेलो मी सरकार आणून काम करण्यासाठी आलेलो आहेत.

वैजापूर - शरद पवारांबाबत आमची इच्छा आहे तुम्ही कधीच स्वस्थ बसू नका. कारण सरकार कधी जाणारच नाही. शरद पवारांना सरकार घालवण्याचा अनुभव आहे. स्वतःच्या पक्षाचे वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली आहे. 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बोलण्यासाठी नाही आलेलो मी सरकार आणून काम करण्यासाठी आलेलो आहेत. काही बोलघेवडे लोक आघाडी सोबत फिरत आहे त्यांना करू द्या. आम्हाला काहीतरी घ्यायचे म्हणून नाही तर काहीतरी द्यायचं म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. मतदार संघात भरपूर इच्छुक कार्यकर्ते असणं हे पक्षाचे वैभव आहे. सर्व इच्छुकांना मी धन्यवाद देतो उमेदवारी दिल्यानंतर सर्वांनी आपल्या इच्छा बाजूला ठेवून एकत्र आलेले आहेत. दोन पक्ष असले तरी विचार एक आहे. भगवा एक आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तान आम्हाला भगवा करायचा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राम मंदिर हा मुद्दा आहे मात्र आम्हाला माणुसकीने कारभार करण्यासाठी आहे. महायुतीचा यज्ञ आपण राष्ट्रभर पेटवलेला आहे. माणसे शरीराने नाही तर मनाने वृद्ध होतात. इथला प्रकल्प अजून मार्गी लागलेला नाही. बेरोजगारांना काम का नाही? बेकराना आम्ही भत्ता देऊ. तरुणांना भत्ता नको त्यांना काम हवे आहे. मेहनत करणारा हा महाराष्ट्र आहे आम्ही त्या तरुणाला काम देऊ, तरुणांना उद्योगधंदे उपलब्ध करून देऊ. भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या मिळवून देऊ. आपला स्वतःचा हक्काचा माणूस किंवा परका माणूस यामध्ये बराच फरक आहे. असं सांगत उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली. 

दरम्यान, आम्ही नेहमी काम करत राहणार आम्ही कधीच स्वस्थ बसू शकणार नाही याला म्हणतात शिवसेना आणि मित्रपक्ष. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील सर्व कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे. काँग्रेसच्या कोणत्या नेत्यावर टीका करायची हेच कळत नाही कारण समोर कोणीच दिसत नाही. सुशीलकुमार म्हणतात राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेपण थकले. इतकी वर्षं सत्तेत होते खाऊन खाऊन थकले. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणतात की आम्हाला आमचे भविष्य आम्हाला माहीत नाही. त्यांना स्वतःचे भविष्य माहीत नाही ते आपले भविष्य काय घडवणार? असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. ही निवडणूक आता जनतेने हातामध्ये घेतली आहे जनता ठरणार आहे की महाराष्ट्रमध्ये कोणाचे सरकार येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे हा माझा महाराष्ट्र आहे तुमचा महाराष्ट्र आहे असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसvaijapur-acवैजापूर