शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 17:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपावर गंभीर आरोप

मुंबई: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेसाठी खलबतं सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. आमची आघाडी होऊ नये यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं वेळकाढूपणा केला, असं म्हणणं योग्य ठरणार नाही, असंदेखील चव्हाण म्हणाले.शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय आल्यावर पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी त्यावर व्यापक चर्चा केली. मात्र शिवसेना एनडीएचा घटक असेपर्यंत याबद्दल चर्चा करणं शक्य नव्हतं. मात्र त्यानंतर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली. यानंतर शिवसेनेसोबत जाण्याबद्दल गांभीर्यानं चर्चा सुरू झाली. आम्ही आमदारांशी संवाद साधून त्यांची मतं सोनिया गांधींना कळवली. त्यानंतर सोनियांनी आम्हाला दिल्लीला बोलावून चर्चा केली. आम्ही त्यांच्यासमोर मतं मांडली. याशिवाय फोनवरदेखील चर्चा केल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.शिवसेनेला पाठिंबा देण्याची पत्रं देण्यास झालेल्या विलंबावर त्यांनी भाष्य केलं. शरद पवारांनीदेखील उद्धव ठाकरेंशी अनौपचारिक चर्चा केली होती. मात्र तोवर पाठिंब्याचं पत्र देण्यास उशीर झाला होता. त्यामुळे चर्चा करुन मगच पुढे जाऊ असा निर्णय घेण्यात आला. पवारांनी सोनिया गांधींनादेखील हा सल्ला दिला. सरकार स्थापन झाल्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे चर्चा करुन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सगळ्याला काँग्रेसचा वेळकाढूपणा म्हणणं योग्य ठरणार नाही, असं चव्हाण यांनी म्हटलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार