शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 17:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपावर गंभीर आरोप

मुंबई: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेसाठी खलबतं सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. आमची आघाडी होऊ नये यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं वेळकाढूपणा केला, असं म्हणणं योग्य ठरणार नाही, असंदेखील चव्हाण म्हणाले.शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय आल्यावर पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी त्यावर व्यापक चर्चा केली. मात्र शिवसेना एनडीएचा घटक असेपर्यंत याबद्दल चर्चा करणं शक्य नव्हतं. मात्र त्यानंतर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली. यानंतर शिवसेनेसोबत जाण्याबद्दल गांभीर्यानं चर्चा सुरू झाली. आम्ही आमदारांशी संवाद साधून त्यांची मतं सोनिया गांधींना कळवली. त्यानंतर सोनियांनी आम्हाला दिल्लीला बोलावून चर्चा केली. आम्ही त्यांच्यासमोर मतं मांडली. याशिवाय फोनवरदेखील चर्चा केल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.शिवसेनेला पाठिंबा देण्याची पत्रं देण्यास झालेल्या विलंबावर त्यांनी भाष्य केलं. शरद पवारांनीदेखील उद्धव ठाकरेंशी अनौपचारिक चर्चा केली होती. मात्र तोवर पाठिंब्याचं पत्र देण्यास उशीर झाला होता. त्यामुळे चर्चा करुन मगच पुढे जाऊ असा निर्णय घेण्यात आला. पवारांनी सोनिया गांधींनादेखील हा सल्ला दिला. सरकार स्थापन झाल्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे चर्चा करुन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सगळ्याला काँग्रेसचा वेळकाढूपणा म्हणणं योग्य ठरणार नाही, असं चव्हाण यांनी म्हटलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार