शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Election 2019: 'भाजपा पक्ष मोठा झालाय; अगोदर तिकीट कापताना विश्वासात घेतलं जायचं पण आता...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 20:24 IST

तिकीट ठरविण्याच्या प्रक्रियेत सामूहिक निर्णय झाला असता तर चांगलं झालं असतं. पक्ष मोठा झालाय, त्यामुळे समन्वय नीट होत नसेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा घोळ संपला, सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले, मात्र या सर्वामध्ये भाजपाच्या तिकीट वाटपावरुन झालेला गोंधळ सगळ्यांनाच पाहायला मिळाला. भाजपाने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यासारख्या दिग्गजांचे तिकीट कापून त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तीला उमेदवारी दिली. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अनेक दिग्गजांचे पत्ते कापल्याने चर्चेला उधाण आलं आहे. पूर्वीप्रमाणे भाजपात समन्वय राहिलेला नाही, अगोदर तिकीट कापताना समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेतलं जायचं पण आता तसं होताना दिसत नाही अशी खंतच प्रकाश मेहता यांनी बोलून दाखविली. गेली 6 टर्म घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहता निवडून येत होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रकाश मेहतांचे तिकीट कापून नगरसेवक पराग शहा यांना संधी देण्यात आली आहे. 

आपल्या तिकीट का दिलं नाही? आमची काही चूक झाली का? असा प्रश्नच तिकीट कापलेल्या नेत्यांसमोर उभा राहिला आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यात येणार आहे याबाबत थोडीही कल्पना या नेत्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळेच की काय या नेत्यांची खंत आता समोर येऊ लागली आहे. तिकीट द्यायचं नव्हतं तर किमान आम्हाला विश्वासात तरी घ्यायचं असे हे नेते बोलू लागले आहेत. तसेच पक्षाने घेतलेला निर्णय आहे तो मान्य करत निवडणुकीनंतर यासर्व गोष्टींची कारणमीमांसा करण्यात येईल असं विनोद तावडे आणि प्रकाश मेहतांनी सांगितलं आहे. 

याबाबत बोलताना प्रकाश मेहतांनी सांगितले की, तिकीट ठरविण्याच्या प्रक्रियेत सामूहिक निर्णय झाला असता तर चांगलं झालं असतं. पक्ष मोठा झालाय, त्यामुळे समन्वय नीट होत नसेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्याला थांबावायचं झालं अथवा दुसरी जबाबादारी घ्यायची असेल तर पूर्वी सांगितले जात होते. पण आता तिकीट कापलं जात असेल त्याबाबत काहीच कल्पना दिली जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

असचं काहीसं मेधा कुलकर्णी यांच्याबाबत घडलं. कोथरुडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. उमेदवारी कुणाला द्यायची हा पक्षाचा निर्णय आहे, हे सांगतानाच, हा निर्णय कळवण्याचं सौजन्यही न दाखवल्यानं मेधा कुलकर्णी भावूक झाल्याचं 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत पाहायला मिळालं होतं.

तसेच विनोद तावडे यांचेही तिकीट कापण्यात आलं. मला उमेदवारी का नाही यात माझी काही चूक की पक्षाची काही चूक झालीय, याचं विश्लेषण करण्याची ही वेळ नाही. मी अमित शाहांशी यासंदर्भात नक्कीच चर्चा करेन. मी विरोधी पक्षनेता झालो, त्यानंतर मंत्री झालो. बरेच जण आमदार पण नाहीत आणि मंत्री पण नाहीत तरीही पक्षाचं काम करतायत. संघाच्या विद्यार्थी परिषदेत असल्यापासून समाजाच्या हिताचं काम करण्याची शिकवण नेहमीच दिली गेली आहे. मला उमेदवारी न देण्याची काही कारणं नक्कीच असतील, पण निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष नेतृत्वाशी बोलता आलेलं नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर काही वेळा विश्वास ठेवावा लागतो अशा शब्दात हताश प्रतिक्रिया तावडेंनी व्यक्त केली आहे.  

 

टॅग्स :BJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडेPrakash Mehtaप्रकाश मेहताChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019