शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 15:07 IST

शिवसेना, भाजपामध्ये सत्तावाटपावरून सुरू असलेलं दबावाचं राजकारण कायम

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटत आले तरी अद्याप महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. शिवसेना, भाजपाला अद्याप सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. राज्याच्या राजकारणात आज घडत असलेल्या घडामोडी पाहता पुढील काही दिवस सरकार स्थापनेचा तिढा कायम राहण्याची चिन्हं आहेत. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लवकरच सत्ता स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. पाटील यांच्यासह भाजपा मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. मतदारांनी सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. महायुतीचं सरकार व्हावं ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची इच्छा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितलं. या बैठकीत भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नसल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी जास्त वेळ लागत असल्यानं राज्यपाल महोदयांशी कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती पाटील यांनी दिली. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. आता राज्यपालांशी झालेल्या चर्चेच्या आधारे पुढे काय करायचं याचा निर्णय घेतला जाईल, असं पाटील म्हणाले.राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत भाजपानं दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. त्यावेळी सत्तापदांच्या समान वाटपाचा शब्द भाजपाकडून देण्यात आला होता. मात्र आता भाजपानं शब्द फिरवला आहे. भाजपा मला खोटा ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव यांनी भाजपाच्या कोर्टात चेंडू ढकलल्यानं सत्ता वाटपाचा तिढा कायम राहण्याची चिन्हं आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलAshish Shelarआशीष शेलारGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे