शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

आम्ही रोज संपर्क साधतोय; पण शिवसेनेकडून प्रतिसादच नाही; गिरीश महाजनांनी दिली खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 19:02 IST

जनमानसांत भाजपाची चुकीची प्रतिमा जाऊ नये, या उद्देशाने भाजपाने चर्चेची ऑफर देऊन शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसताना, भाजपानं आज एक पाऊल पुढे टाकत, 'आधी बसू, मग बोलू', अशी ऑफर शिवसेनेला दिली आहे. आम्ही रोज शिवसेनेला संपर्क साधतोय, परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला. जनमानसांत भाजपाची चुकीची प्रतिमा जाऊ नये, या उद्देशानेच त्यांनी हे पाऊल उचलून शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.  

जे ठरलंय त्याप्रमाणे करा, वेगळ्या प्रस्तावाची गरज नाही - संजय राऊत

कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते; सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान

सर्व विषयांवर चर्चेतून मार्ग काढू, असा समंजसपणा भाजपाने दाखवला असला, तरी मुख्यमंत्रिपदावर कुठलीही तडजोड होणार नाही, हा त्यांचा पवित्रा कायम आहे. वास्तविक, ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद हवंच, या मुद्द्यापासून शिवसेना मागे हटायला तयार नाही. त्यावरूनच चर्चेचं घोडं अडलं आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत जे होऊ शकलं नाही, ते भाजपाच्या चर्चेच्या आवाहनानंतर होईल का, याबद्दल शंकाच आहे. 

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दारं २४ तास खुली; भाजपाने माघारीची शक्यता 'शत-प्रतिशत' फेटाळली!

आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची!

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. त्यानंतर, गिरीश महाजन यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीकडे आपली सविस्तर भूमिका मांडली. या बैठकीनंतर महायुतीचंच सरकार येणार, अशा ठाम विश्वास नेतेमंडळी व्यक्त करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, इतक्या दिवसांनी प्रथमच भाजपाचे नेते शिवसेनेला चर्चेचं आवताण देताना दिसले. त्याबद्दल विचारलं असता गिरीश महाजन यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. निकाल लागल्यापासून सातत्याने भाजपाकडून शिवसेनेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्यांच्याकडून प्रतिसादच मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना रोज माध्यमांसमोर येऊन बोलत असताना, सत्तास्थापनेसाठी भाजपाकडून काहीच प्रयत्न होत नाहीत, असं जनतेला वाटू नये, या हेतूनेच आम्ही आज जाहीरपणे त्यांना चर्चेचं आवाहन करत आहोत, असं त्यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी भाजपाचाच असेल, यावर आम्ही ठाम आहोत. परंतु, त्याबाबतही समोरासमोर बसून चर्चा होणं अधिक सयुक्तिक वाटतं. आमच्याकडे सगळे पर्याय खुले आहेत, असं ते म्हणत आहेत. इकडे-तिकडे जाऊन भेटत आहेत. पण जनतेनं एका विचारधारेला मतदान केलंय. त्यामुळे आम्ही तसं पाप करणार नाही. मोठ्या भावाच्या भूमिकेतून, चर्चेद्वारे मार्ग काढावा, एवढंच आमचं म्हणणं आहे, असं महाजन यांनी सांगितलं. दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, असंही ते आवर्जून म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे