शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आम्ही रोज संपर्क साधतोय; पण शिवसेनेकडून प्रतिसादच नाही; गिरीश महाजनांनी दिली खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 19:02 IST

जनमानसांत भाजपाची चुकीची प्रतिमा जाऊ नये, या उद्देशाने भाजपाने चर्चेची ऑफर देऊन शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसताना, भाजपानं आज एक पाऊल पुढे टाकत, 'आधी बसू, मग बोलू', अशी ऑफर शिवसेनेला दिली आहे. आम्ही रोज शिवसेनेला संपर्क साधतोय, परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला. जनमानसांत भाजपाची चुकीची प्रतिमा जाऊ नये, या उद्देशानेच त्यांनी हे पाऊल उचलून शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.  

जे ठरलंय त्याप्रमाणे करा, वेगळ्या प्रस्तावाची गरज नाही - संजय राऊत

कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते; सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान

सर्व विषयांवर चर्चेतून मार्ग काढू, असा समंजसपणा भाजपाने दाखवला असला, तरी मुख्यमंत्रिपदावर कुठलीही तडजोड होणार नाही, हा त्यांचा पवित्रा कायम आहे. वास्तविक, ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद हवंच, या मुद्द्यापासून शिवसेना मागे हटायला तयार नाही. त्यावरूनच चर्चेचं घोडं अडलं आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत जे होऊ शकलं नाही, ते भाजपाच्या चर्चेच्या आवाहनानंतर होईल का, याबद्दल शंकाच आहे. 

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दारं २४ तास खुली; भाजपाने माघारीची शक्यता 'शत-प्रतिशत' फेटाळली!

आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची!

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. त्यानंतर, गिरीश महाजन यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीकडे आपली सविस्तर भूमिका मांडली. या बैठकीनंतर महायुतीचंच सरकार येणार, अशा ठाम विश्वास नेतेमंडळी व्यक्त करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, इतक्या दिवसांनी प्रथमच भाजपाचे नेते शिवसेनेला चर्चेचं आवताण देताना दिसले. त्याबद्दल विचारलं असता गिरीश महाजन यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. निकाल लागल्यापासून सातत्याने भाजपाकडून शिवसेनेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्यांच्याकडून प्रतिसादच मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना रोज माध्यमांसमोर येऊन बोलत असताना, सत्तास्थापनेसाठी भाजपाकडून काहीच प्रयत्न होत नाहीत, असं जनतेला वाटू नये, या हेतूनेच आम्ही आज जाहीरपणे त्यांना चर्चेचं आवाहन करत आहोत, असं त्यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी भाजपाचाच असेल, यावर आम्ही ठाम आहोत. परंतु, त्याबाबतही समोरासमोर बसून चर्चा होणं अधिक सयुक्तिक वाटतं. आमच्याकडे सगळे पर्याय खुले आहेत, असं ते म्हणत आहेत. इकडे-तिकडे जाऊन भेटत आहेत. पण जनतेनं एका विचारधारेला मतदान केलंय. त्यामुळे आम्ही तसं पाप करणार नाही. मोठ्या भावाच्या भूमिकेतून, चर्चेद्वारे मार्ग काढावा, एवढंच आमचं म्हणणं आहे, असं महाजन यांनी सांगितलं. दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, असंही ते आवर्जून म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे