शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

Maharashtra day: 'कोणालाही माझ्यासारखं जगायला लागू नये म्हणून हा अट्टाहास'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 11:56 AM

लैगिक शिक्षणावर काम करणाऱ्या चांदनी गोरे यांची कहाणी 

पुणे : जन्माला येताना आपण कोणत्या घरात यायचं, हे जसं आपल्या हातात नसतं. तसं पुरुष म्हणून जन्म घ्यावा की स्त्री म्हणून, हेदेखील आपल्या हातात नसतं. पण म्हणून तृतीयपंथीयांनी कायम पिळवणूकच सहन करायची असा अर्थ होत नाही असं तत्वज्ञान आहे चांदणी गोरे यांचं. स्वतः तृतीयपंथी असणाऱ्या आणि लैंगिक शिक्षणासाठी काम करणाऱ्या चांदनी या लहान मुलांमध्ये लैंगिक शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम करतात. सुरुवातीला आपली मुलगी ही स्त्री  किंवा पुरुषापेक्षा काहीतरी वेगळी आहे हे घरचेदेखील स्वीकारत नव्हते. त्यांनी चांदनी यांनी जमेल तेवढे समजवण्याचा, वेळप्रसंगी मारून, धमकी देऊन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण मी वेगळी आहे आणि हे  नैसर्गिक आहे या मतापासून त्या ढळल्या नाहीत. अखेर घरच्यांनी ते मान्य केले. आज त्या निर्भया आनंदी जीवन नावाची संस्था चालवतात. त्या माध्यमातून लहान मुलांना लैंगिक शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक ठिकाणी जाऊन, मुलांना एकत्र करून चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबद्दल त्या सांगतात. वयात येणाऱ्या मुलांच्या समस्या समजून त्यांची मानसिक गुंतागुंत दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यावेळी अनेक लहान मुलांच्या शारीरिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या असून त्यातूनही त्या मार्ग काढत असतात. याकरता मुलांचे, पालकांचे मतपरिवर्तन करावे लागते. वेळप्रसंगी वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पण कोणावरही शारीरिक अत्याचार होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. यासोबतच तृतीयपंथीयांसाठी त्या बचतगट चालवतात. त्यांना शिक्षणाचे, बचतीचे महत्व पटावे, त्यांनी समाजात सन्मानाने वावरावे असा त्यांचा प्रयत्न असतो. त्या सांगतात की, तृतीयपंथीयांना बाकी काही नको असते. ते आसुसलेले असतात ते प्रेमासाठी. समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. असे झाले नाही तर कायम समाजव्यवस्थेच्या बाहेरच राहतील असे त्यांना वाटते. आज समाज वेगाने बदलत असला, तरी जे माझ्यासारखे पुढे आले त्यांनाच स्वीकारले गेले. जे कायम मागे राहिले त्यांना काळाने मागेच ठेवले असे त्या दुर्दैवाने नमूद करतात. चांदनी या पुण्यातल्या गरीब लोकवस्तीत राहतात. जिथे हातातोंडाशी गाठ पडत नाही, तिथे लैंगिक शिक्षणाचे काय महत्त्व असणार? मात्र तरीही, माझे शरीर, माझा अधिकार हा हक्क प्रत्येकाला हवा असे त्यांचे स्पष्ट मत आहे. आजही चांदनी दुवामध्ये नाचतात. तृतीयपंथी म्हणून करण्यात येणारे काम त्यांनी कधीच लपवले नाही. पण माणूस म्हणून त्यांचे काम अधिक स्तिमित करणारे आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास मी स्वतःला स्वीकारलं, तेव्हा जगाने मला स्वीकारलं. जे माझा वेगळेपणा बघून हसतात, त्यांच्या विचारात असणारे मागासलेपण बघून मीही त्यांना हसते. शेवटी समाजाने आम्हाला मोठ्या मनाने स्वीकारलं तर त्यात सगळ्यांचं हित आहे. तसं  झालं नाही तरी आमचं अस्तित्व नाकारून चालणार नाही, हेदेखील सत्य समाजाला स्वीकारावं लागणारच आहे. चांदनी यांचे शब्द अधिक टोचतात, कारण त्यांना सत्याची धार आहे. आकाशातल्या चांदणीप्रमाणे उपेक्षितांच्या आयुष्यात लखलखणाऱ्या चांदनी यांच्या कामाला खूप खूप सदिच्छा ! 

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे