शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

"दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक...", 'आदिपुरुष'वर बंदी घाला", कॉंग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 18:14 IST

आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.

आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. विविध राजकीय पक्षांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अशातच महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक असल्याची टीकाही त्यांनी केली. "रामायण आणि महाभारत या मालिका काँग्रेसच्या काळात चित्रित झाल्या होत्या", असेही त्यांनी सांगितले. 

"रामायण आणि महाभारत या मालिका काँग्रेसच्या काळात चित्रित झाल्या होत्या. रामायण आणि महाभारताचे वास्तव काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात त्यावेळी ठेवले होते. भाजप स्वतः म्हणते की हे हिंदूंचे सरकार आहे, त्यामुळे हनुमानजींना टपोरींसारखे वक्तव्य करायला लावण्याचे पाप भाजपने केले आहे. ही भाजपची मोठी चूक आहे, त्यांनी माफी मागावी आणि आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालावी", अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 

आदिपुरूष चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता केंद्र सरकारने आपली भूमिका जाहीर केली आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) हा निर्णय घेतला असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. चित्रपटातील संवाद बदलण्याचे आश्वासनही लेखक आणि दिग्दर्शक यांनी दिले आहे. लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, निर्मात्यांनी संवाद बदलण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या मला मिळाल्या आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

विरोध अन् प्रचार 'आदिपुरूष' सुसाटआदिपुरूष चित्रपटाला वाढत चाललेला विरोध चित्रपटाला फायदा करून देत असल्याचे दिसते. कारण चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी काही संवाद बदलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे सुधारित संवादांसह चित्रपट दाखवण्यात येणार आहे. खरं तर राजकीय पक्ष देखील 'आदिपुरुष'वरून रिंगणात उतरले आहेत. अनेकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :AdipurushआदिपुरूषNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाHinduहिंदू