शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

"दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक...", 'आदिपुरुष'वर बंदी घाला", कॉंग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 18:14 IST

आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.

आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. विविध राजकीय पक्षांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अशातच महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक असल्याची टीकाही त्यांनी केली. "रामायण आणि महाभारत या मालिका काँग्रेसच्या काळात चित्रित झाल्या होत्या", असेही त्यांनी सांगितले. 

"रामायण आणि महाभारत या मालिका काँग्रेसच्या काळात चित्रित झाल्या होत्या. रामायण आणि महाभारताचे वास्तव काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात त्यावेळी ठेवले होते. भाजप स्वतः म्हणते की हे हिंदूंचे सरकार आहे, त्यामुळे हनुमानजींना टपोरींसारखे वक्तव्य करायला लावण्याचे पाप भाजपने केले आहे. ही भाजपची मोठी चूक आहे, त्यांनी माफी मागावी आणि आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालावी", अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 

आदिपुरूष चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता केंद्र सरकारने आपली भूमिका जाहीर केली आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) हा निर्णय घेतला असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. चित्रपटातील संवाद बदलण्याचे आश्वासनही लेखक आणि दिग्दर्शक यांनी दिले आहे. लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, निर्मात्यांनी संवाद बदलण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या मला मिळाल्या आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

विरोध अन् प्रचार 'आदिपुरूष' सुसाटआदिपुरूष चित्रपटाला वाढत चाललेला विरोध चित्रपटाला फायदा करून देत असल्याचे दिसते. कारण चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी काही संवाद बदलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे सुधारित संवादांसह चित्रपट दाखवण्यात येणार आहे. खरं तर राजकीय पक्ष देखील 'आदिपुरुष'वरून रिंगणात उतरले आहेत. अनेकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :AdipurushआदिपुरूषNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाHinduहिंदू