शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

उद्धव ठाकरे शपथविधीः महाराष्ट्रात 'उद्धवपर्वा'चा उदय; बाळासाहेबांचं स्वप्न साकार, शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 18:45 IST

Uddhav Thackeray's Oath Ceremony: 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...' राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलं.शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  

महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच; पण राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  

'छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन...' असे उद्गार संध्याकाळी ६.४०च्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवरच्या भव्यदिव्य रंगमंचावरून घुमले आणि तमाम शिवसैनिक शहारले, थरारले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कातीलच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या वडिलांना वंदन केलं. 

महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि राजकारणावर अमीट छाप उमटवणाऱ्या, राज्याचा 'रिमोट कंट्रोल' मानल्या जाणाऱ्या, मात्र सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहिलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातील व्यक्ती थेट राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत असल्यानं आजचा शपथविधी हा शिवसेनेसाठी अनुपम्य सोहळाच ठरला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि राज्यातील प्रमुख नेते, त्यांच्या मित्रपक्षांचे प्रमुख, मनसेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते. याआधी २४ वर्षांपूर्वी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी याच शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना या जुन्या मित्रांनी, भावांनी एकत्र लढवली होती. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत ही युती केंद्रात आणि राज्यात सत्तेतही होती. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात खटका उडाला आणि हा वाद तुटेपर्यंत ताणला गेला. त्यानंतर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या भिन्न विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या झेंड्याखाली उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेचं समीकरण जुळवलं आणि आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार स्थापन झालं.

महाराष्ट्र विकास आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासाठी ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री, राष्ट्रवादीला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री, काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री, तर मित्रपक्षांना एक कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chief Ministerमुख्यमंत्री