शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra CM: चंद्रकांत पाटील, तोंड सांभाळून बोला; संजय राऊत भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 15:10 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात पहिली खडाजंगी झाली.    

शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार, हे जवळपास पक्कं झालेलं असतानाच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. कुणाच्या ध्यानीमनीही नसलेली गोष्ट आज सकाळी सकाळी घडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीच, पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवलं. त्यानंतर, राज्यात पुन्हा एकदा वेगवान घडामोडी पाहायला मिळताहेत आणि शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध रंगताना दिसतंय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात पहिली खडाजंगी झाली.    

संजय राऊत तुम्ही शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावलीत. आता तरी शांत बसा. राऊतांच्या तोंडी खंजीर खुपसल्याची भाषा शोभत नाही, अशी चपराक चंद्रकांत पाटील यांनी लगावली होती. त्याला संजय राऊत यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. मला गप्प बस सांगायला ते शिवसेनाप्रमुख आहेत का? चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचा विचार करावा. स्वतःच्या पक्षाला वाचवावं. हे चोरासारखे वागले आहेत आणि ते त्यांना महागात पडेल. चंद्रकांत पाटील, तुम्ही तोंड सांभाळून बोला. हा महाराष्ट्र आहे, असं राऊत यांनी खडसावलं.  

'अजित पवार आयुष्यभर तडफडतील!'

भाजपला जाऊन मिळालेल्या अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान केला आहे. त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहे, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार आयुष्यभर तडफडत राहतील, अशा तीव्र संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मात्र, अजित पवार परत येऊ शकतात. त्यांना ब्लॅकमेल केल्याची मला खात्री आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

अमित शहांचे 'ते' वाक्य होतं राजकीय भूकंपाची चाहुल, आज दिला 'धक्का'!

'अजितदादांसोबत शपथविधीला गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितली 'राज(भवन) की बात'

मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असे बोला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

'मला आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीनं भूमिका मांडणार'

रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया'

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार