शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

Maharashtra CM: उद्धव ठाकरे सरकारने केलं बहुमत सिद्ध; भाजपाने केला सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 15:38 IST

महाविकासआघाडीची बहुमत चाचणी पार पडली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे.

ठळक मुद्देमहाविकासआघाडीची बहुमत चाचणी पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे. महाविकासआघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे. मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहीले आहेत.

मुंबई - महाविकासआघाडीची बहुमत चाचणी पार पडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे. महाविकासआघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे. बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहीले आहेत. तर भाजपाने सभात्याग केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारची शनिवारी (30 नोव्हेंबर) शक्तिपरीक्षा होती. या बहुमत चाचणीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास झाले आहेत.

अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय झाला. भाजपा आमदारांकडून सभागृहात गदारोळ झाला.  आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भाजपाने सभात्याग करत विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभेचे विशेष अधिवेशन यासाठी बोलविण्यात आलं होतं. मात्र संविधानाची पायमल्ली करुन सभागृहाचं कामकाज सुरू आहे. विधानसभा अधिवेशन नियमाला धरुन बोलाविले नाही, राज्यपालांनी कोणतंही समन्स काढलं नाही, त्यामुळे हे अधिवेशन असैविधानिक आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध आहे. शपथ घेताना एक मसूदा असतो. राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर मंत्र्यांनी अनेक नेत्यांची नावे घेतली. पहिल्यांदाच हंगामी अध्यक्ष बदलण्याचा नियमबाह्य काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत विधानसभा अध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव मांडता येत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच गुप्त मतदानपद्धतीने निवडणूक झाली असती तर यांचा पराभव झाला असता म्हणून  विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेणं टाळलं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच दिवसापुरता मर्यादित होता. सुप्रीम कोर्टाचे आदेश, नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नाही असा निर्णय आम्ही घेत सभात्याग केला आहे. सभागृहात झालेले कामकाज नियमबाह्य असल्याने या कामकाजाला मान्यता देऊ नये असं राज्यपालांना पत्र देणार आहे अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सभागृहाची कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी पॉईंट ऑफ ऑर्डर देऊन  सगळे नियम, कामकाज धाब्यावर बसवून सभागृहाचं कामकाज सुरु आहे, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह सुरु आहे. देशाच्या इतिहासात कधीही हंगामी अध्यक्ष अधिवेशन सुरु असताना बदलला नाही, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्याशिवाय आजतागायत विश्वासदर्शक ठराव मांडला गेला नाही अशी विधानसभेची प्रथा-परंपरा आहे, बहुमत असताना का निवडणूक घेतली नाही? असा सवाल सभागृहात उपस्थित केला. तसेच रात्री उशिरा आम्हाला कळविले जाते अधिवेशन आहे, बहुमत आहे तर अधिवेशन इतक्या उशिरा बोलविण्याची गरज का पडली? आमचे आमदार उपस्थित राहू नये म्हणून हे केलं का? असा टोलाही सरकारला लगावला.  

त्यावर मंत्रिपदाची शपथ ही सभागृहातील घटना नाही, याचा अधिकार राज्यपालांना, मंत्रिमंडळाला हंगामी अध्यक्ष बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो. राज्यपालांनी केलेली निवड यामुळे सभागृह चालविण्याचा अधिकार मला प्राप्त झाला आहे, आजचं अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे, 7 दिवसांत अधिवेशन पुन्हा घेता येतं. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळला. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे