Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:59 IST2025-10-17T19:56:43+5:302025-10-17T19:59:45+5:30
Charbhatti Village Naxal-free: गडचिरोली जिल्ह्यातील चारभट्टी गाव पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले.

Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
गडचिरोली जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत दिलासादायक व ऐतिहासिक घडामोड समोर आली. जिल्ह्यातील चारभट्टी गाव, जे एकेकाळी नक्षलवादाचा गड मानले जात होते आणि जिथे नक्षलवाद्यांच्या परवानगीशिवाय कोणताही शासकीय किंवा स्थानिक निर्णय घेतला जात नव्हता, ते गाव आता पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले.
Gadchiroli, Maharashtra: A villager says, "During the time when Naxalism was active in our village and Suresh was involved in that movement, the perception of people outside whether officials or businessmen toward us was extremely negative. Even though Suresh was a Naxalite,… pic.twitter.com/dkepLRAnYz
— IANS (@ians_india) October 17, 2025
या घोषणेमुळे गडचिरोली परिसरातील सुरक्षा आणि विकासाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले. चारभट्टी गाव हे नक्षलवाद्यांच्या कारवायांचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जात होते, ज्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागत होते. स्थानिक प्रशासनाच्या आणि सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे तसेच गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे मोठे परिवर्तन शक्य झाले.
Gadchiroli, Maharashtra: A villager says, "Between 2002 and 2005, the influence of Naxalites in Charbhatti was so strong that no decision or activity could take place without their approval or alignment with their ideology. They operated with complete control and maintained an… pic.twitter.com/ZydRuQCEr3
— IANS (@ians_india) October 17, 2025
या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे चारभट्टी गाव आता भयमुक्त वातावरणात विकासाच्या नव्या वाटांवर चालू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या बदलामुळे येथील नागरिकांना आता लोकशाही प्रक्रियेत पूर्ण स्वातंत्र्याने सहभागी होता येणार आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.