शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

....आता अजित  पवार नाराज? झाले नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:04 IST

Maharashtra Assembly Winter Session: एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या २४ तासांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थाप झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षात मंत्रिपदाने हुलकावणी दिलेले नेते त्यांची नाराजी कुठल्या ना कुठल्या मार्गाने व्यक्त करत आहेत. त्यामध्ये मंत्रिपद न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या २४ तासांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामधून सत्ताधारी पक्षांमधील अनेक विद्यमान प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला होता. तसेच अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदाची संधी न देता नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यावरून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या २४ तासांपासून कुठालाही भेट दिलेली नाही. तसेच सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन त्यात महायुतीला २३० हून अधिक जागांवर विजय मिळाला होता. या विजयानंतर जवळपास १३ दिवसांनंतर महायुतीच्या सरकारचा शपथविधी झाला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारालाही आणखी आठ दिवसांचा अवधी लागला होता. दरम्यान, अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

राज्याच्या विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरू आहे. मात्र या अधिवेशनात अजित पवार यांची अनुपस्थितीत ठळकपणे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून दिल्लीत पोहोचले आहेत. महायुती सरकारमधील खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी दिल्ली गाठल्याची चर्चा आहे. नव्या सरकारमध्ये वित्त आणि महिला व बालकल्याण खातं मिळावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahayutiमहायुती