शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

....आता अजित  पवार नाराज? झाले नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:04 IST

Maharashtra Assembly Winter Session: एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या २४ तासांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थाप झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षात मंत्रिपदाने हुलकावणी दिलेले नेते त्यांची नाराजी कुठल्या ना कुठल्या मार्गाने व्यक्त करत आहेत. त्यामध्ये मंत्रिपद न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या २४ तासांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामधून सत्ताधारी पक्षांमधील अनेक विद्यमान प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला होता. तसेच अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदाची संधी न देता नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यावरून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या २४ तासांपासून कुठालाही भेट दिलेली नाही. तसेच सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन त्यात महायुतीला २३० हून अधिक जागांवर विजय मिळाला होता. या विजयानंतर जवळपास १३ दिवसांनंतर महायुतीच्या सरकारचा शपथविधी झाला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारालाही आणखी आठ दिवसांचा अवधी लागला होता. दरम्यान, अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

राज्याच्या विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरू आहे. मात्र या अधिवेशनात अजित पवार यांची अनुपस्थितीत ठळकपणे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून दिल्लीत पोहोचले आहेत. महायुती सरकारमधील खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी दिल्ली गाठल्याची चर्चा आहे. नव्या सरकारमध्ये वित्त आणि महिला व बालकल्याण खातं मिळावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahayutiमहायुती