शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारे निघाले मारेकरी, मल्लिकार्जुन खरगे यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:34 IST

पंतप्रधान सांगतात त्यांचे अपयश

सांगली : ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देत आहेत. वास्तव पाहिले तर लोकांना लोकांपासून तोडण्याचे व त्यांना मारण्याचे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केले आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगलीत केली.काँग्रेसचे सांगली विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथील नेमिनाथनगरच्या क्रीडांगणावर रविवारी सभा झाली. यावेळी कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, आमदार विश्वजित कदम, कर्नाटकचे आमदार बी. आर. पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव काझी मोहम्मद निजामुद्दीन आदी उपस्थित होते.खरगे म्हणाले, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे विषारी साप आहेत. समाजात विष पेरण्याचे काम ते करतात. त्यामुळे या सापाला मारण्याशिवाय पर्याय नाही. योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे नेते घिरट्या घालत महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिरत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालके ठार झाली, तिकडे जायला योगी यांना वेळ नाही. मात्र महाराष्ट्रात ते प्रचार करीत फिरत आहेत. त्यांना कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरात येऊ कसे दिले? पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री हे मणिपूर जळत असताना त्याठिकाणी जायचे कष्ट घेत नाहीत. महाराष्ट्रात प्रचारासाठी मात्र, त्यांना पुरेसा वेळ आहे. विदेशात फिरायला पंतप्रधान जातात, पण देशात एक प्रांत जळतोय त्याची त्यांना काळजी नाही.

पंतप्रधान सांगतात त्यांचे अपयश‘एक है, तो सेफ है’ असा नारा पंतप्रधान देताहेत. म्हणजे त्यांच्या नेतृत्वात देशात एकी नाही. त्यांना देश एक ठेवण्यात अपयश आलेले आहे, हे त्यांनीच सिद्ध केले, अशी टीका खरगे यांनी केली.

तुमच्याकडे पैसा, आमच्याकडे जनता..एका आमदाराला पन्नास खोके देण्यात येत असतील, तर भाजपकडे किती पैसा आहे, याची कल्पना येईल. पण, त्यांच्याकडे पैसा असला, तर आमच्याकडे जनता आहे. आम्ही जनतेच्या जोरावर महाराष्ट्रातील सत्तेवरून त्यांना पायउतार व्हायला भाग पाडू, असे खरगे म्हणाले.

खरगे यांचे मराठीतून भाषण..खरगे यांनी हिंदीमधून भाषणास सुरुवात केली. शेवटची वीस मिनिटे त्यांनी उपस्थितांशी मराठीतून संभाषण केले. जे शब्द आठवत नव्हते ते विचारून मराठीतच भाषण पूर्ण केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024