शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 15:38 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊत आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडणे लावत आहेत. सहा महिने थांबा, संजय राऊतांच्या बोलण्याने काय काय झालेय, ते कळेल, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएमवर टीका करत असून, अनेक उमेदवार फेरमतमोजणीची मागणी करत आहेत. भाजपा नेत्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. 

रावसाहेब दानवे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, पाच तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे, आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. जसे ठरले तसे सुरू आहे, कोणताही वाद आमच्यामध्ये नाही. मुख्यमंत्रीपद कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, मात्र मुख्यमंत्री कोण हे आमचे ठरले आहे. जोपर्यंत वरिष्ठांची सही होत नाही, तोवर अधिकृतरित्या नाव जाहीर केले जात नाही, असा आमच्या पार्टीचा विषय आहे. भाजपा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे. वरिष्ठांचा शिक्का बसत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदी कोण? याबाबत कुठलीही घोषणा होणार नाही. कोणतीही अडचण नाही. सगळे ठरल्याप्रमाणेच होणार आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते

संजय राऊत काय म्हणतात किंवा आतापर्यंत काय बोललेत, याचा इतिहास जर काढला, तर नक्कीच एखादा डॉक्टर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देईल. ते जे बोलले, ते खोटे ठरले आहे. संजय राऊतांनी शिवसेना फोडली. संजय राऊत आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडणे लावत आहेत. सहा महिने थांबा, संजय राऊतांच्या बोलण्याने काय काय झालेय, ते कळेल. शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेला नसता, तर २०१४ ते २०१९ या काळात जसे सरकार चालवले गेले तसेच ते आताही सुरू असते. २०१९ ला तर बहुमत आलेच असते. परंतु, आता ते सोबत असते, तर आताही जास्त बहुमत मिळाले असते, असा दावा दानवे यांनी केला. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे वृत्त दानवे यांनी फेटाळून लावले आहे. एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत, केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली ही बातमी आहे. ते स्वतःच्या गावी गेले आहेत, यात शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही. ते आजारी आहेत. त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असेल, गावी जाण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे, असे दानवे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा