शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 15:38 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊत आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडणे लावत आहेत. सहा महिने थांबा, संजय राऊतांच्या बोलण्याने काय काय झालेय, ते कळेल, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएमवर टीका करत असून, अनेक उमेदवार फेरमतमोजणीची मागणी करत आहेत. भाजपा नेत्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. 

रावसाहेब दानवे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, पाच तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे, आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. जसे ठरले तसे सुरू आहे, कोणताही वाद आमच्यामध्ये नाही. मुख्यमंत्रीपद कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, मात्र मुख्यमंत्री कोण हे आमचे ठरले आहे. जोपर्यंत वरिष्ठांची सही होत नाही, तोवर अधिकृतरित्या नाव जाहीर केले जात नाही, असा आमच्या पार्टीचा विषय आहे. भाजपा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे. वरिष्ठांचा शिक्का बसत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदी कोण? याबाबत कुठलीही घोषणा होणार नाही. कोणतीही अडचण नाही. सगळे ठरल्याप्रमाणेच होणार आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते

संजय राऊत काय म्हणतात किंवा आतापर्यंत काय बोललेत, याचा इतिहास जर काढला, तर नक्कीच एखादा डॉक्टर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देईल. ते जे बोलले, ते खोटे ठरले आहे. संजय राऊतांनी शिवसेना फोडली. संजय राऊत आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडणे लावत आहेत. सहा महिने थांबा, संजय राऊतांच्या बोलण्याने काय काय झालेय, ते कळेल. शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेला नसता, तर २०१४ ते २०१९ या काळात जसे सरकार चालवले गेले तसेच ते आताही सुरू असते. २०१९ ला तर बहुमत आलेच असते. परंतु, आता ते सोबत असते, तर आताही जास्त बहुमत मिळाले असते, असा दावा दानवे यांनी केला. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे वृत्त दानवे यांनी फेटाळून लावले आहे. एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत, केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली ही बातमी आहे. ते स्वतःच्या गावी गेले आहेत, यात शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही. ते आजारी आहेत. त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असेल, गावी जाण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे, असे दानवे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा