शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

'कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात', अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 15:52 IST

'विकास योजनांच्या नावाखाली लाखो-करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही.'

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 ( Marathi News ) : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Interim Budget Session 2024 ) सोमवारपासून (दि.26) सुरू झाले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आज अर्थमंत्री अजित पवार यांनी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. आता या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली. 

'शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही'विधानसभेबाहेर मीडियाशी संवाद साधताना उद्ध ठाकरे म्हणाले की, 'राज्य सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे. नुकताच राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला, त्याचप्रमाणे संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आणि महाराष्ट्रारा या अवकाळी घोषणांचा फटका बसेल का, इशी भीती आहे. विकास योजनांच्या नावाखाली लाखो-करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा झाली, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 

'हे तर टेंडर सरकार आहे''महायुती सरकारच्या दीड-दोन वर्षांचा कारभार पाहिला तर मुंबईत रस्ते घोटाळा झाला, राज्यात अनेक घोटाळे झाले. हे सरकार टेंडरवर टेंडर काढत आहे. आम्ही यांच्या घोटाळ्याचा भांडाफोड केला तर दुसरे टेंडर काढले जाते. प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. या महायुतीच्या सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात, अशाप्रकारचा आहे,' अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

शिवस्मारकाचे काय झाले?ते पुढे म्हणाले, 'आज अंगवाडी सेविका, आशा वर्कर संपावर आहेत, त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांविना, ऑषधांविना अनेकांचा मृत्यू होतोय. त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार नवीन रुग्णालयांची घोषणा करत आहे. जुन्या घोषणांचे काय झाले, त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि नवीन घोषणा करण्याचे मृगजाळ आहे. शिवरायांच्या गडकिल्ल्यांबद्दल आम्ही जे धोरण घेतले होते, त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ज्या शिवस्माराकाचे जलपुजन झाले होते, ते पुर्ण करण्याची गॅरंटे कोण घेणार. पुढचे पाठ मागचे सपाट असा अर्थसंकल्प आहे,' अशी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली. 

मराठा आंदोलकांना अतिरेकी ठरवणार का?यावेळी उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलनावरही भाष्य केले. 'मनोज जरांगेंनी आंदोलनाची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्यावर लाठीहल्ला झाला, महिलांची डोकी फोडली. जणु काय अतिरेकीच घुसले, अशाप्रकारची वागणूक त्यांना दिली गेली. आता जरांगेंनी सरकारवर विविध आरोप केले आहेत. फोन रेकॉर्ड तपासण्याची चर्चा सुरू झाली आहे. आताच्या पोलीस महासंचालिका फोन रेकॉर्डमध्ये एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडून गृहमंत्री फडणवीसांनी तो सर्व रेकॉर्ड घ्यावा आणि कारवाई करावी. जो आंदोलन करतो, त्यांना अतिरेकी ठरण्यापर्यंत तुमची मजल जाते. एखाद्याची मागणी पूर्ण होत नसेल, तर त्याला विश्वासात घेऊन समजावले पाहिजे. जरांगेंची मागणी सोडून तुम्ही त्यांच्या मागे का लागाला आहात? तुम्ही एसआयटी लावणार असाल, तर चिवटपणाने चौकशी करा,' अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी यावेळी दिली.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2024Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे