शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 09:23 IST

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं तो सेफ हैं' या वक्तव्यावरून भाष्य केले आहे. ते म्हणाले जर न्याय असेल तर भारत सुरक्षित आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच धुळ्यातील प्रचार सभेला संबोधित करताना 'एक हैं तो सेफ' अशी घोषणा केली होती.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा पारा जसजसा वर जात आहे, तस-तसे नेते मंडळींचे एकमांवरील आरोप प्रत्यारोपही वाढताना दिसत आहेत. यातच आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपति संभाजीनगरमधील एका प्रचारसभेत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं तो सेफ हैं' या वक्तव्यावरून भाष्य केले आहे. ते म्हणाले जर न्याय असेल तर भारत सुरक्षित आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच धुळ्यातील प्रचार सभेला संबोधित करताना 'एक हैं तो सेफ' अशी घोषणा केली होती.

काय म्हणाले ओवेसी -ओवेसी म्हणाले, "मजलिस म्हणत आहे की, 'हम अनेक हैं तो अखंड हैं'. मोदींची एक करायची इच्छा आहे. RSS ची एक करण्याची इच्छा आहे. मी म्हणतो, 'इंसाफ है तो इंडिया सेफ है', 'संविधान है तो सम्मान है', 'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'. छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या मनाने माणणारे असतील, तर प्रेम आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय करत आहेत. तर मोदी एक काम करत आहेत,मराठा विरुद्ध ओबीसी करत आहेत. हे एक होण्यासंदर्भात बोलत आहेत आणि आम्ही अनेकांसंदर्भात बोलत आहोत. यांची एकीच्या नावावर सर्वांनमध्ये भांडण लावण्याची इच्छा आहे."

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?मोदी म्हणाले होते, "आदिवासींची ओळख, अनुसूचित जाती जमातींची एकता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. आदिवासी जातींची एकजूट काँग्रेसला सहन होत नाहीये. काँग्रेसचा अजेंडा आहे की, देशभरातील आदिवासी जाती एकमेकांविरुद्ध लढत रहाव्यात, त्यांची सामूहिक आदिवासी ताकद संपावी. धर्माच्या नावावर असाच कट काँग्रेसने रचला होता तेव्हा देशाचे तुकडे झाले. आता काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे 'एक हैं तो सेफ हैं'. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे."

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर