शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 09:23 IST

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं तो सेफ हैं' या वक्तव्यावरून भाष्य केले आहे. ते म्हणाले जर न्याय असेल तर भारत सुरक्षित आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच धुळ्यातील प्रचार सभेला संबोधित करताना 'एक हैं तो सेफ' अशी घोषणा केली होती.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा पारा जसजसा वर जात आहे, तस-तसे नेते मंडळींचे एकमांवरील आरोप प्रत्यारोपही वाढताना दिसत आहेत. यातच आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपति संभाजीनगरमधील एका प्रचारसभेत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं तो सेफ हैं' या वक्तव्यावरून भाष्य केले आहे. ते म्हणाले जर न्याय असेल तर भारत सुरक्षित आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच धुळ्यातील प्रचार सभेला संबोधित करताना 'एक हैं तो सेफ' अशी घोषणा केली होती.

काय म्हणाले ओवेसी -ओवेसी म्हणाले, "मजलिस म्हणत आहे की, 'हम अनेक हैं तो अखंड हैं'. मोदींची एक करायची इच्छा आहे. RSS ची एक करण्याची इच्छा आहे. मी म्हणतो, 'इंसाफ है तो इंडिया सेफ है', 'संविधान है तो सम्मान है', 'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'. छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या मनाने माणणारे असतील, तर प्रेम आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय करत आहेत. तर मोदी एक काम करत आहेत,मराठा विरुद्ध ओबीसी करत आहेत. हे एक होण्यासंदर्भात बोलत आहेत आणि आम्ही अनेकांसंदर्भात बोलत आहोत. यांची एकीच्या नावावर सर्वांनमध्ये भांडण लावण्याची इच्छा आहे."

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?मोदी म्हणाले होते, "आदिवासींची ओळख, अनुसूचित जाती जमातींची एकता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. आदिवासी जातींची एकजूट काँग्रेसला सहन होत नाहीये. काँग्रेसचा अजेंडा आहे की, देशभरातील आदिवासी जाती एकमेकांविरुद्ध लढत रहाव्यात, त्यांची सामूहिक आदिवासी ताकद संपावी. धर्माच्या नावावर असाच कट काँग्रेसने रचला होता तेव्हा देशाचे तुकडे झाले. आता काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे 'एक हैं तो सेफ हैं'. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे."

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर