शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपने बहुमत सिद्ध करावेचं'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 3:39 PM

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : भाजपने वानखेडे स्टेडियमवर नव्हेच तर चंद्रावर जाऊन स्त्तास्थापेनेचा सोहळा पार पाडवा असा खोचक टोला राऊत यांनी भाजपला लगावला.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत असला तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे. अन्यथा आमच्याकडे पर्याय असल्याचा दावा करून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपला सर्वात आधी बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे, व त्यांनी सुद्धा ते सिद्ध केले पहिजे असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकार स्थापनेसाठी उशीर होत आहे. मात्र सर्वात जास्त आमदार निवडून आलेल्या भाजपची जवाबदारी आहे की, त्यांनी सरकार स्थापन केली पाहिजे. भाजपकडे बहुमत नसेल तर, राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी पर्याय आहे का ? याचे अधिकार राज्यपाल यांना आहे. मात्र तसेही काही होताना दिसत नसल्याचे राऊत म्हणाले.

सत्तास्थापनेसाठी भाजपकडे आम्ही कोणताही प्रस्ताव मागितला नसून, भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये समसमान सत्तेचा फॉर्म्युला आधीच ठरेलला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन हा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगितले होते. मात्र निवडणुका होताच ते पलटी मारायला लागले असतील तर आम्हीही कोणत्याही फॉर्म्युल्यासाठी लाचार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

तर भाजपकडे बहुमत असले तर त्यांनी खुशाल सत्तास्थापना करावी. एवढच नाही तर भाजपने वानखेडे स्टेडियमवर नव्हेच तर चंद्रावर जाऊन स्त्तास्थापेनेचा सोहळा पार पाडवा असा खोचक टोला राऊत यांनी भाजपला लगावला. तसेच आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपला सर्वात आधी बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे. भाजपकडे ईडी,सीबीआय सारख्या  यंत्रणा आहेत. याचा उपयोग करून त्यांनी बहुमत सिद्ध करायाला पाहिजे. त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचे सुद्धा राऊत म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा