शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Maharashtra Vidhan Sabha 2024: सरकारच्या काय काय शक्यता असू शकतात महाराष्ट्रात?

By यदू जोशी | Updated: November 21, 2024 05:43 IST

मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. फक्त राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते.

यदु जोशीमुंबई : ‘एक्झिट पोल’ने निकालाची शक्यता वर्तविलेली आहेच; पण असे पोल फसतात व वेगळेच चित्र समोर येते, हे हरियाणाच्या निकालासह अनेक निवडणुकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे निकालापर्यंत शक्य-अशक्यतांचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात सुरूच राहणार आहे. 

एक शक्यता म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तसे झाले तर नवे सरकार आठएक दिवसांच्या आतच स्थापन होईल. एका पक्षाला मुख्यमंत्रिपद व अन्य दोन पक्षांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल. 

मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. फक्त राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. यावेळी मविआची सत्ता आली तर तिन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असतील. मात्र, ते मिळेल एकाच पक्षाला, अन्य दोन पक्ष उपमुख्यमंत्रिपदासाठी अडून बसतील. संख्याबळ जास्त त्याला मुख्यमंत्रिपद असा तोडगा निघू शकतो. 

महायुतीचे सरकार आले तर... 

महायुतीचे सरकार आले तर सध्याचाच फॉर्म्युला म्हणजे एका पक्षाला मुख्यमंत्रिपद व अन्य दोन पक्षांना उपमुख्यमंत्रिपद हे सूत्र कायम असेल. मात्र, मुख्यमंत्रिपद हे संख्याबळाच्या आधारावर दिले जाण्याची शक्यता आहे. 

मात्र, पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपद दिले गेले तर देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, असे मानले जाते. फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळाले तर एकनाथ शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन कसे केले जाईल, हा प्रश्न असेल.  

असेही होऊ शकते...

एक दुसरा विचार राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. तो म्हणजे दोनपैकी ज्यांना बहुमत मिळेल त्यांचेच सरकार येईल की नाही? याला कारण आहे तो २०१९ चा अनुभव. 

त्यावेळी भाजप-शिवसेनेने निर्भेळ बहुमत मिळविले होते. पण आधी फडणवीस-अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तो प्रयोग काही तासांतच फसला आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले.

महाराष्ट्रासाठी ही नवीन बाब होती, तिच्या पुनरावृत्तीची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. 

राष्ट्रपती राजवट कधी? 

निकालात कोणालाही बहुमत मिळाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकेल. राज्यपाल सर्वांत मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवतील. मात्र, ते लगेच कोणता पक्ष समोर आला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. या काळात अनेक गतिमान हालचाली होतील. अपक्षांसह लहान पक्षांच्या आमदारांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न होतील.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग