शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 16:23 IST

Maharashtra Assembly Election 2024 : एवढा पैसा आला कुठून, भाजपनेच नोटबंदी केली होती ना? असा सवाल सुळे यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 :  मुंबई : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप 'बविआ'कडून करण्यात आला आहे. याप्रकरणी विरार येथील एका हॉटेलमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. यावरून आता मतदानाच्या एक दिवस आधीच राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढा पैसा आला कुठून, भाजपनेच नोटबंदी केली होती ना? असा सवाल सुळे यांनी केला आहे.

विनोद तावडे यांच्यावर आरोप होत आहे. यावर माझा विश्वास बसत नाही. मात्र, हे धक्कादायक आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं की, भाजपच्या ओरीजनल लोकांकडून अशी कृती घडेल. तसेच, ५ कोटींचं वाटप होतेय. श्रीनिवास पवार यांच्या ऑफिसमध्ये पोलीस येतात, अनिल देशमुखांवर हल्ला होतो, या देशात चाललंय तरी काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

याचबरोबर, ब्लॅक मनीमुळे नोटबंदी भाजपनेच केली होती. मग भाजपकडे हे पाच कोटी रुपये आले कोठून? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच, या गलिच्छ कृतीचा मी निषेध करत भाजपचे सरकार येणार नाही, हे त्यांच्या नेत्यांना समजले असेल असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. याशिवाय, विनोद तावडेंकडून ही अपेक्षा नव्हती. ते महाराष्ट्रात मंत्री राहिलेत, ते शिक्षणमंत्री होते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

नेमकं काय आहे प्रकरण?मतदानाच्या आदल्या दिवशीच विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप 'बविआ'ने केला आहे. 'बविआ'चे नेते हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की, मला भाजपावाल्यांचा फोन आला, तावडे ५ कोटी घेऊन येतायेत, इतका मोठा नेता पैसे का घेऊन येतील, असं मला वाटलं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा पैसे वाटप सुरू असल्याचं दिसलं. तावडे आल्यापासून इथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. मला डायरी मिळाली, निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. 

भाजपा नेत्यांनी काय सांगितले?विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून अशाप्रकारे ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करतायेत हे मुळात हास्यास्पद आहे. कालपासून महाविकास आघाडीने निवडणूक आपल्या हातातून गेली हे त्यांच्या वर्तनातून आणि वागण्यातून दिसून येते. उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रात यश मिळाले. प्रचार सभा संपेपर्यंत महाविकास आघाडीने सभा, माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे सगळे दावे चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो, असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेVinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाHitendra Thakurहितेंद्र ठाकूर