शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी?; काँग्रेस-शरद पवारांसोबत जागावाटप ते रणनीती यावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 23:29 IST

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह मागील ३ दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतली. 

नवी दिल्ली - महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखत आहे. त्यात मुंबईचा मातोश्री बंगला जे कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिले आहे. जिथे आज उद्धव ठाकरे राहतात. बाळासाहेब ठाकरे असताना या बंगल्यावर मोठमोठ्या नेत्यांची रिघ असायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडत थेट दिल्ली गाठली आहे. 

३ दिवसीय दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी अशी ही भेट होती. भाजपासोबत युती तुटल्यापासून ठाकरे आणि गांधी कुटुंब एकमेकांच्या जवळ आले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा केली. 

त्यातच धारावीच्या प्रकल्पावरून शरद पवारांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत अदानींच्या धारावी प्रकल्पावर चर्चा झाल्याचं बोलले गेले. मात्र दिल्लीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्याचसोबत दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचीही भेट घेतली. केजरीवालांच्या आई वडिलांची विचारपूस केली. जवळपास ३० मिनिटे उद्धव ठाकरे केजरीवालांच्या घरी होते. 

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय काय झालं?

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. 
  • पुढील महिन्याच्या आत जागावाटप केलं जावं, त्यावरही चर्चा झाली
  • कोण किती जागा लढणार यावर सर्वांची सहमती झाली पाहिजे, जर काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला तर एकत्र बसून तोडगा काढला जाईल
  • जागावाटपानंतर सर्वांनी मजबुतीने एकसाथ प्रचारासाठी पुढे यायला हवं.
  • लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विभागवार आकड्यांच्या आधारे सर्वाधिक मतांची टक्केवारीला प्राधान्य दिलं जावं. 
  • प्रत्येक पक्षाने सर्व्हे केलेत, परंतु सर्व्हेसोबतच प्रत्येक पक्षाच्या ताकदीचा हवाला घेत जागावाटप व्हावं
  • निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अंतिम होईल
  • महाराष्ट्रात ठाकरे, पवार आणि काँग्रेससोबतच सपा आणि आपसारख्या पक्षांची मदत घेतली जाईल.
  • भाजपाला हरवणं हे एकमेव उद्दिष्ट महाविकास आघाडीचे असेल यावर सर्वांचे एकमत झाले.
  • शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अदानी आणि धारावी प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज, मतभेद दूर झाल्याचं बोललं जाते. 

 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत १०० ते ११० जागांवर उद्धव ठाकरे उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी पुढील महिनाभरात जागावाटपावर एकमत व्हावं असं टार्गेट निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी ठरण्याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जाते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४