शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी?; काँग्रेस-शरद पवारांसोबत जागावाटप ते रणनीती यावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 23:29 IST

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह मागील ३ दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतली. 

नवी दिल्ली - महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखत आहे. त्यात मुंबईचा मातोश्री बंगला जे कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिले आहे. जिथे आज उद्धव ठाकरे राहतात. बाळासाहेब ठाकरे असताना या बंगल्यावर मोठमोठ्या नेत्यांची रिघ असायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडत थेट दिल्ली गाठली आहे. 

३ दिवसीय दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी अशी ही भेट होती. भाजपासोबत युती तुटल्यापासून ठाकरे आणि गांधी कुटुंब एकमेकांच्या जवळ आले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा केली. 

त्यातच धारावीच्या प्रकल्पावरून शरद पवारांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत अदानींच्या धारावी प्रकल्पावर चर्चा झाल्याचं बोलले गेले. मात्र दिल्लीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्याचसोबत दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचीही भेट घेतली. केजरीवालांच्या आई वडिलांची विचारपूस केली. जवळपास ३० मिनिटे उद्धव ठाकरे केजरीवालांच्या घरी होते. 

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय काय झालं?

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. 
  • पुढील महिन्याच्या आत जागावाटप केलं जावं, त्यावरही चर्चा झाली
  • कोण किती जागा लढणार यावर सर्वांची सहमती झाली पाहिजे, जर काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला तर एकत्र बसून तोडगा काढला जाईल
  • जागावाटपानंतर सर्वांनी मजबुतीने एकसाथ प्रचारासाठी पुढे यायला हवं.
  • लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विभागवार आकड्यांच्या आधारे सर्वाधिक मतांची टक्केवारीला प्राधान्य दिलं जावं. 
  • प्रत्येक पक्षाने सर्व्हे केलेत, परंतु सर्व्हेसोबतच प्रत्येक पक्षाच्या ताकदीचा हवाला घेत जागावाटप व्हावं
  • निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अंतिम होईल
  • महाराष्ट्रात ठाकरे, पवार आणि काँग्रेससोबतच सपा आणि आपसारख्या पक्षांची मदत घेतली जाईल.
  • भाजपाला हरवणं हे एकमेव उद्दिष्ट महाविकास आघाडीचे असेल यावर सर्वांचे एकमत झाले.
  • शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अदानी आणि धारावी प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज, मतभेद दूर झाल्याचं बोललं जाते. 

 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत १०० ते ११० जागांवर उद्धव ठाकरे उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी पुढील महिनाभरात जागावाटपावर एकमत व्हावं असं टार्गेट निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी ठरण्याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जाते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४