शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी?; काँग्रेस-शरद पवारांसोबत जागावाटप ते रणनीती यावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 23:29 IST

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह मागील ३ दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतली. 

नवी दिल्ली - महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखत आहे. त्यात मुंबईचा मातोश्री बंगला जे कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिले आहे. जिथे आज उद्धव ठाकरे राहतात. बाळासाहेब ठाकरे असताना या बंगल्यावर मोठमोठ्या नेत्यांची रिघ असायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडत थेट दिल्ली गाठली आहे. 

३ दिवसीय दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी अशी ही भेट होती. भाजपासोबत युती तुटल्यापासून ठाकरे आणि गांधी कुटुंब एकमेकांच्या जवळ आले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा केली. 

त्यातच धारावीच्या प्रकल्पावरून शरद पवारांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत अदानींच्या धारावी प्रकल्पावर चर्चा झाल्याचं बोलले गेले. मात्र दिल्लीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्याचसोबत दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचीही भेट घेतली. केजरीवालांच्या आई वडिलांची विचारपूस केली. जवळपास ३० मिनिटे उद्धव ठाकरे केजरीवालांच्या घरी होते. 

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय काय झालं?

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. 
  • पुढील महिन्याच्या आत जागावाटप केलं जावं, त्यावरही चर्चा झाली
  • कोण किती जागा लढणार यावर सर्वांची सहमती झाली पाहिजे, जर काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला तर एकत्र बसून तोडगा काढला जाईल
  • जागावाटपानंतर सर्वांनी मजबुतीने एकसाथ प्रचारासाठी पुढे यायला हवं.
  • लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विभागवार आकड्यांच्या आधारे सर्वाधिक मतांची टक्केवारीला प्राधान्य दिलं जावं. 
  • प्रत्येक पक्षाने सर्व्हे केलेत, परंतु सर्व्हेसोबतच प्रत्येक पक्षाच्या ताकदीचा हवाला घेत जागावाटप व्हावं
  • निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अंतिम होईल
  • महाराष्ट्रात ठाकरे, पवार आणि काँग्रेससोबतच सपा आणि आपसारख्या पक्षांची मदत घेतली जाईल.
  • भाजपाला हरवणं हे एकमेव उद्दिष्ट महाविकास आघाडीचे असेल यावर सर्वांचे एकमत झाले.
  • शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अदानी आणि धारावी प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज, मतभेद दूर झाल्याचं बोललं जाते. 

 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत १०० ते ११० जागांवर उद्धव ठाकरे उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी पुढील महिनाभरात जागावाटपावर एकमत व्हावं असं टार्गेट निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी ठरण्याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जाते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४