शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:35 IST

नगर जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरता आणि विखे-थोरात संघर्षामागे शरद पवारांचा हातभार, विखे पाटलांचा आरोप

मुंबई - राहुल गांधी यांनी मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं. सुजयच्या निवडणुकीवेळी त्याला राष्ट्रवादीकडून उभे राहायला राहुल यांनी सांगितले. जागांची अदलाबदल करावी असं आम्ही म्हणत होतो. नगर दक्षिणची निवडणूक सलग ३ वेळा राष्ट्रवादी हरली होती. मी शरद पवारांना दोनदा भेटलो ते म्हणाले माझे कार्यकर्ते ऐकत नाही. त्यानंतर मी राहुल गांधींना भेटलो, खरगेही तिथे होते. सुजय राष्ट्रवादीकडून का लढत नाहीत असं राहुल गांधींनी सांगितले. काँग्रेसचे अध्यक्षच असं बोलत असतील तर पुढे काय करायंच. मग आम्ही भाजपात प्रवेश केला असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

एका मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भेटीनंतर मी सुजयला फोन केला, तू देवेंद्र फडणवीसांशी बोलून निर्णय घे. जिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांचे ऐकत नाही. तिथे आम्ही राष्ट्रवादीचं तिकिट घेऊन लढायचं याचा अर्थ राजकीय आत्महत्या केल्यासारखे आहे असं त्यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विखे पाटील-थोरात संघर्षाला शरद पवारांना जबाबदार धरलं. 

भाऊसाहेब असे पर्यंत जिल्ह्यात संघर्षाची स्थिती नव्हती. त्यानंतर राजकीय स्थिंत्यातरे झाली. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली. शरद पवारांचा राजकीय घडामोडींना हात होता. नगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरात यांचा संघर्ष तीव्र करण्यात शरद पवारांचा हातभार लागला. त्यामुळे हे चित्र आज पाहायला मिळतंय. पहिल्यापासून आमच्या वडिलांचा आणि शरद पवारांचा संघर्ष झाला. जिल्ह्यात जोपर्यंत राजकीय अस्थिरता निर्माण करत नाही तोवर त्यांचेही जिल्ह्यात राजकीय गणित साध्य होणार नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना आमच्या वडिलांविरोधात भूमिका घ्यायला लावली. शरद पवारांच्या राजकारणाला बाळासाहेब बळी पडले. त्यातून संघर्ष आणखी वाढत गेला असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरातांना आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत त्यांच्या हातात राज्य दिले तर शेतीपासून अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल असं विधान शरद पवारांनी राहाता येथील प्रचारसभेत केले. तरुणांच्या रोजगाराची मोठी समस्या आहे. शेतीत अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवायचे असतील तर बाळासाहेब थोरातांना तुम्ही निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. मी काही विधानसभेत जाणार नाही. थोरात तिथे आहेत. राज्यात कृषिमंत्री म्हणून त्यांनी देशातील इतर कृषिमंत्र्यांच्या तुलनेने सर्वोत्तम काम केले असं सांगत पवारांनी बाळासाहेब थोरातांचं कौतुक केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात