शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:35 IST

नगर जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरता आणि विखे-थोरात संघर्षामागे शरद पवारांचा हातभार, विखे पाटलांचा आरोप

मुंबई - राहुल गांधी यांनी मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं. सुजयच्या निवडणुकीवेळी त्याला राष्ट्रवादीकडून उभे राहायला राहुल यांनी सांगितले. जागांची अदलाबदल करावी असं आम्ही म्हणत होतो. नगर दक्षिणची निवडणूक सलग ३ वेळा राष्ट्रवादी हरली होती. मी शरद पवारांना दोनदा भेटलो ते म्हणाले माझे कार्यकर्ते ऐकत नाही. त्यानंतर मी राहुल गांधींना भेटलो, खरगेही तिथे होते. सुजय राष्ट्रवादीकडून का लढत नाहीत असं राहुल गांधींनी सांगितले. काँग्रेसचे अध्यक्षच असं बोलत असतील तर पुढे काय करायंच. मग आम्ही भाजपात प्रवेश केला असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

एका मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भेटीनंतर मी सुजयला फोन केला, तू देवेंद्र फडणवीसांशी बोलून निर्णय घे. जिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांचे ऐकत नाही. तिथे आम्ही राष्ट्रवादीचं तिकिट घेऊन लढायचं याचा अर्थ राजकीय आत्महत्या केल्यासारखे आहे असं त्यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विखे पाटील-थोरात संघर्षाला शरद पवारांना जबाबदार धरलं. 

भाऊसाहेब असे पर्यंत जिल्ह्यात संघर्षाची स्थिती नव्हती. त्यानंतर राजकीय स्थिंत्यातरे झाली. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली. शरद पवारांचा राजकीय घडामोडींना हात होता. नगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरात यांचा संघर्ष तीव्र करण्यात शरद पवारांचा हातभार लागला. त्यामुळे हे चित्र आज पाहायला मिळतंय. पहिल्यापासून आमच्या वडिलांचा आणि शरद पवारांचा संघर्ष झाला. जिल्ह्यात जोपर्यंत राजकीय अस्थिरता निर्माण करत नाही तोवर त्यांचेही जिल्ह्यात राजकीय गणित साध्य होणार नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना आमच्या वडिलांविरोधात भूमिका घ्यायला लावली. शरद पवारांच्या राजकारणाला बाळासाहेब बळी पडले. त्यातून संघर्ष आणखी वाढत गेला असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरातांना आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत त्यांच्या हातात राज्य दिले तर शेतीपासून अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल असं विधान शरद पवारांनी राहाता येथील प्रचारसभेत केले. तरुणांच्या रोजगाराची मोठी समस्या आहे. शेतीत अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवायचे असतील तर बाळासाहेब थोरातांना तुम्ही निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. मी काही विधानसभेत जाणार नाही. थोरात तिथे आहेत. राज्यात कृषिमंत्री म्हणून त्यांनी देशातील इतर कृषिमंत्र्यांच्या तुलनेने सर्वोत्तम काम केले असं सांगत पवारांनी बाळासाहेब थोरातांचं कौतुक केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात