शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 18:46 IST

Maharashtra Assembly Election 2024: काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित तवार हे तडकाफडकी निघून गेल्याने या चर्चांना अधिकच उधाण आलं होतं. दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून तडकाफडकी निघून जाण्यामागचं नेमकं कारणं अजित पवार यांनी सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 

मागच्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट महायुती सरकारमध्ये राहणार की नाही याबाबबत राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित तवार हे तडकाफडकी निघून गेल्याने या चर्चांना अधिकच उधाण आलं होतं. दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून तडकाफडकी निघून जाण्यामागचं नेमकं कारणं अजित पवार यांनी सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 

याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, असं काहीही घडलेलं नाही. वृत्तवाहिन्यांना २४ तास काही ना काही दाखवायचं असतं. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने बातम्या सोडल्या जातात. काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात माझा कार्यक्रम होता. १० वाजता कॅबिनेटची बैठक होती. मात्र ती काही कारणानं उशिरा सुरू झाली. तर १ वाजता माझं विमान होतं. कॅबिनेट उशिरा सुरू झाल्याने ११.३० ते १ वाजेपर्यंत मी तिथे थांबलो. मात्र १ वाजता माझं जाणं गरजेचंच होतं. त्यामुळे मी १२.३० ला तिथून निघालो. विमानानं नांदेडला पोहोचून पुढे हेलिकॉप्टरनं अहमदपूरला जायचं होतं, असे अजित पवार यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, अहमदपूरला अगदी साधेपणाने शेतकरी मेळावा संपन्न झाला. काल एक दु:खद घटना घडली होती. त्यामुळे कुठलंही स्वागत स्वीकारलं नाही. तिथे रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कार्यक्रम आटोपल्यावर मी परत मुंबईला आलो, असेही अजित पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४