शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 19:20 IST

शरद पवार यांचा मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजित पवारांवर निशाणा

बारामती - केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने राज्यात अपेक्षित लक्ष देणे शक्य झाले नाही. त्यामुळे राज्याची जबाबदारी काही लोकांवर सोपवली. विश्वासाने जबाबदारी,सत्ता दिली. त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला. त्या लोकांनी वेगळे पाऊल टाकले. लोकांना वाटत स्वप्नात वाटलं नव्हतं ,असे त्या लोकांकडून घडले अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

शिरूर आंबेगाव मतदार संघातील उमेदवार देवदत्त निकम यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या  भेटीला येथील ‘गोविंदबाग’निवासस`थानी आले होते. यावेळी पवार यांनी वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. पवार म्हणाले,यंदा ‘मविआ’समोर केंद्र आणि राज्याची सत्ता असणारी,पंतप्रधानांचा पाठींबा असणारी शक्ती आहे.त्यांच्याकडे सत्तेच्या  जोरावर तूम्हा लोकांना वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो असा विश्वास आहे.मागील ५ वर्षांपुर्वी  परिस्थिती वेगळी होती. राष्ट्रवादी एकत्र होती.त्यावेळी सत्ता आल्यावर बारामती आणि आंबेगाव ला मंत्री पद दिले. तर राज्यमंत्री पद इंदापूर ला दिले. जिल्ह्यात ३ मंत्री पदे कधी मिळाली नव्हती. त्यांच्याकडून जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे होतं. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे होते. पक्षाने यांना सत्ता दिली. सत्ता आणण्यासाठी कार्यकर्ते यांनी कष्ट घेतले.त्यामुळे यांना मंत्रीपदे मिळाली. मात्र, याची आठवण आपल्या सहकारी यांना झाली नाही. ४४ आमदारांना घेवून आपले काहीजण दुसऱ्या बाजुला मिळाले.या भुमिकेत जनता सहभागी झाली नाही.पण प्रतिनिधी मात्र सहभागी झाला. त्यामुळे लोकांना धक्का बसल्याचे पवार म्हणाले.

दत्तात्रय वळसे पाटील यांनी मला जीवापाड सहकार्य  केले. त्यांच्या सांगण्यामुळे त्यांच्या मुलाला सोबत घेतलं. त्यांना ताकद दिली. मंत्रीपदासह देशातील, राज्यातील काही महत्त्वाच्या संस्थांची जबाबदारी दिली.  विश्वासातील लोक असावीत म्हणून हे केलं. मात्र, त्यांनी वेगळी निर्णय घेतला. सत्ता कायम टिकत नसते. सत्तेपेक्षा सत्तेवर बसविणारा सामान्य माणूस  महत्त्वाचा असतो. त्यांनी जी भूमिका घेतली ती सामान्य माणसाला आवडली नाही. तुम्ही सुध्दा,असा प्रश्न सर्वसामान्य त्यांना विचारतात असा टोला पवार यांनी वळसे पाटील यांना लगावला. यावेळी समोरील लोक साधनाने, सत्तेच्या अधिकाराने पुर्ण ताकतीने आहेत. कारण त्यांना तुम्ही काय करू शकता हे कळाले आहे. तुम्ही फाटक्या खिशाचे असला तरी प्रामाणिक,बांधिलकी,निष्ठा जपणारे आहात. निवडणूकीत चिकाटीने काम केल्यास यश मिळेल. देशाला समजले पाहिले असे  यश मिळवा असे आवाहन पवार यांनी केले.

लोकशाही मध्येे मोठी शक्ती आहे.१९७२ साली दुसर्यांदा मंत्री झालो होतो.त्यावेळी दाैंड तालुक्यात वर्तमान पत्र घरोघरी वाटणारा व्यक्ती आमदार झाला होता.ती व्यक्ती प्रामाणिक होती.स्वातंत्र्य चळवळीत ते तरुंगात गेले होते.लोकांनी त्यांना निवडुन दिले.हि लोकांची शक्ती आहे.लोकशाहीत मोठी शक्ती असल्याची आठवण  शरद पवार यांनी सांगितली. प्रचारासाठी १४ दिवस आहेत.तर ८९ विधानसभा मतदारसंघ आहेत. सगळीकडून माझ्यावर दबाव आहे.प्रचारासाठी वेळ देण्याची सर्वत्र मागणी आहे.कोणत्या मतदारसंघात प्रचारासाठी जाण्याचे नियोजन अद्याप केलेले नसल्याचे शरद पवार यांनी नमुद केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीshirur-acशिरूरDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार