शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 12:55 IST

कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये यासाठी नेत्यांचे काम असते, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यानंतर मनसेनं पलटवार केला आहे.

मुंबई - माहिम मतदारसंघात यंदा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे तर उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे माहिम मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु सदा सरवणकर हे माघार घेण्यास तयार नव्हते. त्यात कार्यकर्त्यांना खचू न देणे ही नेत्याची जबाबदारी असते असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यामुळे मनसेकडूनही त्यावर पलटवार केला आहे.

मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले की, माहिम मतदारसंघात आम्ही त्यांच्याकडे कुठलाही प्रस्ताव घेऊन गेलो नाही की या जागेवर तुम्ही माघार घ्या. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर लगेच आम्ही विधानसभेला स्वबळावर लढणार हे जाहीर केले होते. त्यामुळे माहिम जागेबाबत चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त जेव्हा तुमचा मुलगा लोकसभेला उभा होता तेव्हा राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेतली होती. आज आमचे राजू पाटील तिथे उभे आहेत. तुमच्याकडे थोडीही माणुसकी नाही तुम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करता. तुमच्या मुलासाठी राजू पाटील आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा नसतानाही त्यांनी काम केले. त्याची परतफेड करणे ही भावना तुमच्याकडे नाहीच, ते तुमच्या मनात मेलेले आहे. राज ठाकरेंचा स्वभाव प्रचंड वेगळा आहे. नातेसंबंध ते जपतात. वरळीतही मागील वेळी मनसेनं उमेदवार दिला नव्हता. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे हे संकुचित विचारांचे लोक आहेत अशी बोचरी टीका त्यांनी केली.

तसेच अंबरनाथमध्ये जे घडलं, ते म्हणजे लोकसभेला ज्याप्रकारे संकेत एकनाथ शिंदे यांनी विधानसभेबाबतीत दिले होते ते त्यांनी पाळले नाहीत. राजू पाटील आणि आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांची श्रीकांत शिंदेंचा प्रचार करण्याची इच्छा नव्हती. केवळ राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर सर्व हेवेदावे, मतभेद विसरून त्यांनी श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता. आता विधानसभेला तिथे त्याची परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा एकनाथ शिंदे अशी भूमिका घेत असतील तर ते आश्चर्यकारक आहे असं विधान मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केले आहे.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

लोकसभा निवडणुकीच्या वेळा आम्ही एकत्र होतो. माझी राज ठाकरेंशी चर्चादेखील झाली होती. मी त्यांना तेव्हाच विचारलं होतं की विधानसभेसाठी तुमची रणनीती काय असेल? त्यावेळी ते मला म्हणाले होते की, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीची चर्चा होऊ दे. त्यानंतर आपण बोलूया, पण त्यांनी थेट उमेदवार देण्यास सुरुवात केली. (माहिममध्ये जेथून अमित ठाकरे लढणार आहेत,) तेथून आमचाही आमदार दोन-तीन टर्मपासून जिंकत आला आहे. सदा सरवणकर हे आमचे जुने सहकारी आणि कार्यकर्ता आहेत. ते आमचे आमदार आहेत. मी त्यांच्याशीही चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्याबाबत खूपच आक्रमक आहेत. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचीही काळजी घ्यावी लागते. कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये हे देखील नेत्यांचे काम असते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेmahim-acमाहीमmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूक