शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:35 IST

१९९५ साली राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा गैर काँग्रेस सरकार शिवसेना-भाजपा युतीचं आलं होते.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यंदा ६५.१ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. यावेळी पहिल्यांदाच ६ प्रमुख राजकीय पक्षांसोबत इतर छोटेमोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सर्व पक्षांनी मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत आणलं. २०२४ च्या निवडणुकीत बंपर व्होटिग झाल्यामुळे जवळपास १०० विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील मतदारांनी भरघोस मतदान केले होते. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. १९९५ साली राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा गैर काँग्रेस सरकार शिवसेना-भाजपा युतीचं आलं होते. तज्ज्ञानुसार, महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमकपणे प्रचार केला. भाजपाकडून बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमुळे निवडणकीतील वातावरण तापवण्यात आलं. मुस्लीम संघटनांकडून महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या मोहिमेमुळे या घोषणा पुढे आल्या. त्याशिवाय महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षफुटीमुळे भावनिक वातावरण करण्यात आले. 

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत, मागील निवडणुकीच्या तुलनेने २०२४ मध्ये मतदारांच्या संख्येत वाढ झाली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी ८.८५ कोटी मतदार होते त्यात यंदा वाढ होऊन ९.६९ टक्के मतदार झाले. निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा सत्ता बदलते पण महाराष्ट्र त्याला अपवाद आहे. याठिकणी काही वेळा मतदान वाढले तर सत्ता बदलली तर काही वेळा सत्ताधाऱ्यांना फायदा झाला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढल्याने महाविकास आघाडीला फायदा झाला. लोकसभेला ६१.३९ टक्के मतदान झाले. महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते तर महायुतीला ४२.१७ टक्के मते मिळाली होती. 

 दरम्यान, २००४ मध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाल्याचा फायदा झाला. २००४ मध्ये ६३.४४ टक्के मतदान झाले होते. तेव्हा राष्ट्रवादीला ७१ आणि काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या आणि पुन्हा आघाडीचं सरकार आलं. त्याकाळी शिवसेनेला ६१ तर भाजपाला ५४ जागा मिळाल्या. २०१४ च्या निवडणुकीतही मतदानात चार टक्क्यांनी वाढ झाली होती आणि महाराष्ट्रात सरकार बदलले होते. २०१४ मध्ये ६३.३८ टक्के मतदानानंतर भाजपा १२५ जागा जिंकत एक नंबरचा पक्ष बनला. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली, पण ६३ जागा जिंकता आल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले.

कमी मतदानानंतरही सत्ता बदलली नाही

महाराष्ट्राच्या गेल्या ३० वर्षांच्या निवडणूक इतिहासात असे प्रसंग आले आहेत की कमी मतदान होऊनही सरकार बदलले नाही. २००९ मध्ये मतदानाची टक्केवारी कमी होऊनही राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेत आली. २००९ मध्ये ५९.६८ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी घसरल्याचा फायदा सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसला झाला. काँग्रेसने ८२ तर राष्ट्रवादीने ६२ जागा जिंकून सत्ता टिकवली. विरोधात बसलेल्या शिवसेना आणि भाजपाला एकूण ११० जागा मिळाल्या. त्यावेळी मनसेने १३ जागा जिंकून महायुतीला धक्का दिला होता. २०१९ मध्ये देखील ६१.४४ टक्के मतदान झाले, जे मागील निवडणुकीच्या तुलनेत २ टक्के कमी होते परंतु सरकार बदलले नाही. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक 2024VotingमतदानBJPभाजपाcongressकाँग्रेस