शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
“या अधिवेशनात...”; विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी
3
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
4
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
5
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
6
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
7
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
8
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
9
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
10
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
11
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
12
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
13
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
14
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
15
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
16
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
17
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
18
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
19
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
20
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:19 IST

बारामती येथील जाहीर सभेत असिम सरोदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा किस्सा बोलून दाखवला. 

बारामती - मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठा फायदा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी जरांगे पाटलांचा मोठा हातभार राहणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर मी जरांगेंशी बोललो, माझे भाग्य त्यांनी आपलं ऐकलं आणि निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ते असिम सरोदे यांनी केला आहे.

बारामती येथील सभेत असिम सरोदे म्हणाले की, शरद पवार माझ्या ऑफिसला आले होते, मी जरांगेबाबत त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मी उद्धव ठाकरेंनाही सांगितले तेही म्हणाले तुम्ही बोलून घ्या. आम्हाला वाटलं आम्ही लोकसभेला इतक्या सभा घेतल्या आणि विधानसभा निवडणुकीला हे काय सुरू झालं. जर मराठा समाजाच्या नावाखाली इतके लोक उभे राहत असतील तर मतांच्या विभाजनाचा फायदा कोणाला होईल म्हणून मी जरांगे पाटलांकडे गेलो. त्यांच्याकडे खूप गर्दी होती. ते म्हणाले आपल्याला निवांत बोलायचं असेल तर या सर्वांना भेटून मी घालवतो, मग आपण बोलू. रात्री ११.३० वाजता आमची बैठक सुरू झाली. ३ वाजेपर्यंत विविध विषयांवर आमची चर्चा झाली असं त्यांनी सांगितले. 

'त्या' बैठकीत काय घडलं? 

जरांगेसोबतच्या बैठकीत मी त्यांना म्हटलं, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी तुम्ही लावून धरली ती अत्यंत महत्त्वाची सामाजिक काम आहे. तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून हीच भूमिका कायम ठेवा, जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावेत असं कुणाकुणाला वाटत होते, तर यादी काढा. सगळ्यात पहिले देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती. दुसरे होते महाजन, तिसरे होते लक्ष्मण हाके अशा काही लोकांची यादी काढली तर त्यांना  फायदा द्यायचा आहे म्हणून तुम्ही निवडणुकीला उभं राहिले पाहिजे असं वाटत होते. तुम्ही समाजात फूट पाडू नका याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. माझं भाग्य त्यांनी ते ऐकले आणि आपण निवडणुकीत उभे राहणार नाही असा निर्णय घेतला असा दावा असिम सरोदे यांनी केला. 

दरम्यान, मला देवेंद्र फडणवीसांचा खूप राग आहे, कारण त्यांनी मराठा मोर्चावर पोलिसांच्या मदतीने यांनी महिलांवर लाठीचार्ज केला असं जरांगेंनी मला सांगितले. फडणवीस आणि भाजपाला मी पाठिंबा देणार नाही असं जरांगे म्हणाले. लोक आपल्या अनुभवातून शिकतात.  ओबीसी समाजालाही फडणवीसांबद्दल राग आहे कारण १७ जाती कुठल्याही डेटाविना त्यांनी ओबीसी प्रवर्गात घेतल्या. या सगळ्या रागाचे एकत्रीकरण आपल्याला करता आले पाहिजे असं असिम सरोदे यांनी जनतेला म्हटलं. 

राक्षसी प्रवृत्तीचा पराजय करायचाय 

सदाभाऊ खोत यांनी ज्याप्रकारे शरद पवारांवर विधान केले त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला राग आहे. एक माणूस खंबीरपणे आजारातून उठून लोकशाही, संविधानासाठी उभा राहतो. तुम्ही त्यांच्यावर टीका करता हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही. त्या सभेला गोपीचंद पडळकर, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, फडणवीस हसत होते. हे हसणं राक्षसी कृत्य आहे. असं राजकारण आपल्याला अपेक्षित नव्हते. ही निवडणूक केवळ बारामतीची नाही, पुणे- मुंबईची नाही, महाराष्ट्राची निवडणूक आहे जिथे सभ्यतेची असभ्यतेशी लढाई आहे. या लढाईत आपण सर्वांनी उभं राहिले पाहिजे. आपल्याला राक्षसी प्रवृत्तीचा पराजय करायचा आहे. देव देव करणारे नरेंद्र मोदी आणि माणसांमध्येच देव बघणारे शरद पवार हा फरक आपल्याला समजला पाहिजे. प्रत्येकाचा देव आहे, प्रत्येकाचा धर्म आहे. कुणी हात जोडून पूजा करतो, कुणी हात उभे करून पूजा करतो. त्या प्रत्येक माणसाची संविधानात किंमत समान ठेवली आहे. देवाधर्माच्या नावाने आग लावून जे राजकारण इथं पेटवलं जातंय ते विझवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जातीधर्मावर आधारित विषारी राजकारण सुरू केले. मानसिक त्रास देणारं शापित राजकारण महाराष्ट्रात आणलं गेले, त्यांना धडा शिकवायचा आहे असं असिम सरोदेंनी भाजपावर टीका केली.

जातीधर्माच्या नावाने मते मागतायेत

लोकशाहीची प्रतिमा संविधानातून निर्माण झाली आहे. प्रश्न विचारण्याचा अधिकार, आंदोलन करण्याचा अधिकार, एखादी गोष्ट मान्य नसेल तर त्याविरोधात आंदोलन करण्याचा आपल्याला अधिकार आहे. मी वकील म्हणून काम करतो. बदलापूरची घटना झाली, २ लहान मुलींवर अत्याचाराचे प्रसंग पुढे आले. त्या प्रकरणात अनेक गोष्टी घडल्या आहेत असं लक्षात आले. काही लोकांना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचं एन्काऊंटर करण्यात आलं. त्याचे सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केला. कायद्याचा वापर बदला घेण्यासाठी केला जातो. ईडी, सीबीआय, आयकर विभाग या यंत्रणा संविधानाच्या दृष्टीने तयार झाल्यात त्यांचा वापर बदला घेण्यासाठी केला जातो त्याला भारतातील लोकांचा विरोध आहे. कुठलेही भरीव काम समाजासाठी भाजपाने केले नाही त्यामुळे धर्माच्या नावावर मते मागितली जाते. छत्रपती शिवाजी महाराज न समजणाऱ्या माणसांनी पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. हा पुतळा कोसळला. हिंदू मुस्लीम इथं एक आहेत. 'तू ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा' तुम्ही माणूस बघून दाखवा. जन्माने तुम्ही हिंदू बनू शकता, मुस्लिम बनू शकता, कोण दाढी वाढवते, कोण वाढवत नाही, कोणी टोपी घालेल कुणी नाही, तुम्ही आतमधला माणूस शोधा. माणसाला माणूस भेटत नाही. आपल्याला माणूस भेटता आले पाहिजे. जे जे माणसांमध्ये दरी निर्माण करत असतील अशा राजकारणावर फुली मारली पाहिजे असं आवाहन सरोदेंनी केले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAsim Sarodeअसिम सराेदेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस