शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:36 IST

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील इच्छुकांना उभे करण्याची तयारी करत आहेत. 

जालना - समाजाची ताकद एकजुटीने दिसणे गरजेचे आहे. समाजाच्या मतांची विभागणी झाल्यास इतरांनाच याचा फायदा होऊन परत तेच समाजाच्या डोक्यावर बसतील. आपण एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे असं सांगून स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. अंतरवाली सराटी येथे संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेत अपक्ष उमेदवार उभे करण्याचे तोटे सांगितले.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी उमेदवार देतील त्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल ते स्वीकारावे लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराला आयोग वेगवेगळे चिन्ह देईल. त्यामुळे चिन्हाचा प्रचार करणे अवघड होणार आहे. हे अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर कायद्याच्या नजरेतून ते अपक्ष असल्यामुळे त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर बंधन लागू नसते. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात अथवा सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देऊ शकतात. त्यांना कोणताही व्हिप लागू होत नाही. पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय सगळे आमदार आपल्या शब्दात राहतील, समाजाला सोडून जाणार नाहीत हे सर्व भावनिकता म्हणून बोलणे ठीक आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या प्रत्यक्ष राजकारणात भावना चालत नाहीत. आजपर्यंत समाजाच्या नावावर निवडून आलेले बहुतांश आमदार नंतर समाजाला पाठ दाखवतात हे मागील सत्तर वर्ष आपण बघत आलो आहे. अपक्ष उमेदवार दिले तर अपक्ष व स्वराज्य पक्षाचे उमेदवार यांच्यातच समाजाची मतविभागणी होईल आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना याचा फायदा होऊन तेच निवडून येतील. यामुळे समाजाच्या हातात काहीच राहणार नाही. समाजाचा मोठा घात होईल व परत समाज विखुरला जाईल. अपक्ष म्हणून उमेदवार उभे करण्यात हा सगळ्यात मोठा धोका असल्याचे मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आणून दिले अशी माहिती संभाजीराजेंनी दिली. 

दरम्यान, भविष्यात त्याच्यावर काहीही इलाज करता येणार नाही. त्यामुळे आत्ताच योग्य निर्णय घेऊन आपण एकत्र येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत मांडले. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नोंदणीकृत आहे. आयोगाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. सर्व उमेदवारांना एकच चिन्ह असेल. एबी फॉर्म असणार आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सर्व आमदारांना पक्षांतर बंदी कायदा व व्हीप लागू होणार आहे. त्यांना कायदेशीर बंधने असणार आहेत. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवार न देता, स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर हे उमेदवार उभे करावेत असा प्रस्ताव संभाजीराजेंनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना दिला किंवा अपक्षच उभे करायचे असतील तर मतविभागणी टाळण्यासाठी दोघांनी युती करण्याचाही निर्णय त्यांच्यावर सोपवला आहे असंही संभाजीराजेंनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण