शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
3
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
4
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
5
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
6
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
7
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
8
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
9
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
10
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
11
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
12
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
13
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
14
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
15
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
16
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
17
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
18
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
19
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
20
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:36 IST

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील इच्छुकांना उभे करण्याची तयारी करत आहेत. 

जालना - समाजाची ताकद एकजुटीने दिसणे गरजेचे आहे. समाजाच्या मतांची विभागणी झाल्यास इतरांनाच याचा फायदा होऊन परत तेच समाजाच्या डोक्यावर बसतील. आपण एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे असं सांगून स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. अंतरवाली सराटी येथे संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेत अपक्ष उमेदवार उभे करण्याचे तोटे सांगितले.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी उमेदवार देतील त्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल ते स्वीकारावे लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराला आयोग वेगवेगळे चिन्ह देईल. त्यामुळे चिन्हाचा प्रचार करणे अवघड होणार आहे. हे अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर कायद्याच्या नजरेतून ते अपक्ष असल्यामुळे त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर बंधन लागू नसते. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात अथवा सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देऊ शकतात. त्यांना कोणताही व्हिप लागू होत नाही. पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय सगळे आमदार आपल्या शब्दात राहतील, समाजाला सोडून जाणार नाहीत हे सर्व भावनिकता म्हणून बोलणे ठीक आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या प्रत्यक्ष राजकारणात भावना चालत नाहीत. आजपर्यंत समाजाच्या नावावर निवडून आलेले बहुतांश आमदार नंतर समाजाला पाठ दाखवतात हे मागील सत्तर वर्ष आपण बघत आलो आहे. अपक्ष उमेदवार दिले तर अपक्ष व स्वराज्य पक्षाचे उमेदवार यांच्यातच समाजाची मतविभागणी होईल आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना याचा फायदा होऊन तेच निवडून येतील. यामुळे समाजाच्या हातात काहीच राहणार नाही. समाजाचा मोठा घात होईल व परत समाज विखुरला जाईल. अपक्ष म्हणून उमेदवार उभे करण्यात हा सगळ्यात मोठा धोका असल्याचे मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आणून दिले अशी माहिती संभाजीराजेंनी दिली. 

दरम्यान, भविष्यात त्याच्यावर काहीही इलाज करता येणार नाही. त्यामुळे आत्ताच योग्य निर्णय घेऊन आपण एकत्र येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत मांडले. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नोंदणीकृत आहे. आयोगाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. सर्व उमेदवारांना एकच चिन्ह असेल. एबी फॉर्म असणार आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सर्व आमदारांना पक्षांतर बंदी कायदा व व्हीप लागू होणार आहे. त्यांना कायदेशीर बंधने असणार आहेत. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवार न देता, स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर हे उमेदवार उभे करावेत असा प्रस्ताव संभाजीराजेंनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना दिला किंवा अपक्षच उभे करायचे असतील तर मतविभागणी टाळण्यासाठी दोघांनी युती करण्याचाही निर्णय त्यांच्यावर सोपवला आहे असंही संभाजीराजेंनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण