शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 06:31 IST

Maharashtra Assembly Election 2024: नीतिमत्ता गहाण ठेवून महाराष्ट्रात सत्तेत आलेले राज्यातील भ्रष्ट सरकार गाडण्यासाठी महाविकास आघाडी  मैदानात उतरली असून, सामान्य जनभावना या सरकार विरोधात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जीवनावश्यक पाच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील, अशी ग्वाही उद्धवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी बुधवारी येथे दिली.

 दर्यापूर (अमरावती) - भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नव्हे तर ‘हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे’, असा आहे. नीतिमत्ता गहाण ठेवून महाराष्ट्रात सत्तेत आलेले राज्यातील भ्रष्ट सरकार गाडण्यासाठी महाविकास आघाडी  मैदानात उतरली असून, सामान्य जनभावना या सरकार विरोधात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जीवनावश्यक पाच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील, अशी ग्वाही उद्धवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी बुधवारी येथे दिली.

दर्यापूर येथे बसस्थानक चौकातील धर्माधिकारी कन्या शाळेच्या पटांगणात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह महिलांना तीन हजार रुपये, तर बेरोजगारांना चार हजार रुपये महिना आमचे सरकार देणार आहे. विविध उद्योगांना महाराष्ट्रातील विविध प्रांतात स्थापन करून बेरोजगारी नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना लढवित असून, यावेळी विजय हमखास असा विश्वाससुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दर्शविला. यावेळी मंचावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे,  माजी खासदार अनंत गुढे, रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची वलगाव आणि बडनेरा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यात आली.

उद्धवसेनेचा पंचसूत्री वचननामा, २५ लाखांपर्यंत मोफत उपचारमुंबई - महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्या जाहीरनाम्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र, शिवसेनेची काही वचने आहेत. ती सरकार आल्यानंतर पूर्ण केली जातील. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार, हे आमच्या जाहीरनाम्यात असल्याचे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.

‘मातोश्री’वर उद्धवसेनेचा पंचसूत्री वचननामा गुरुवारी प्रसिद्ध केल्यानंतर ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राला जी आश्वासने दिली होती ती आम्ही पूर्ण करून दाखवली आहेत. आताही जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो आणि जे बोलतो ते आम्ही करतो. राज्यातील बेरोजगारी दूर करणे, भूमिपुत्रांना नोकरी देणार आहोत.

वचननाम्यात काय?- प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर-गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार- प्रत्येक पोलिस ठाण्याबरोबर स्वतंत्र महिला पोलीस ठाणे सुरु करणार-प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट-जात, पात, धर्म, पंथ न पहाता महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण-सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना -जातनिहाय जनगणना करणार.-धारावीकरांना उद्योगांच्या सोयींसह राहते घर देणार.-रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र उभारणार-बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करणार.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी