शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 06:31 IST

Maharashtra Assembly Election 2024: नीतिमत्ता गहाण ठेवून महाराष्ट्रात सत्तेत आलेले राज्यातील भ्रष्ट सरकार गाडण्यासाठी महाविकास आघाडी  मैदानात उतरली असून, सामान्य जनभावना या सरकार विरोधात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जीवनावश्यक पाच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील, अशी ग्वाही उद्धवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी बुधवारी येथे दिली.

 दर्यापूर (अमरावती) - भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नव्हे तर ‘हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे’, असा आहे. नीतिमत्ता गहाण ठेवून महाराष्ट्रात सत्तेत आलेले राज्यातील भ्रष्ट सरकार गाडण्यासाठी महाविकास आघाडी  मैदानात उतरली असून, सामान्य जनभावना या सरकार विरोधात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जीवनावश्यक पाच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील, अशी ग्वाही उद्धवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी बुधवारी येथे दिली.

दर्यापूर येथे बसस्थानक चौकातील धर्माधिकारी कन्या शाळेच्या पटांगणात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह महिलांना तीन हजार रुपये, तर बेरोजगारांना चार हजार रुपये महिना आमचे सरकार देणार आहे. विविध उद्योगांना महाराष्ट्रातील विविध प्रांतात स्थापन करून बेरोजगारी नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना लढवित असून, यावेळी विजय हमखास असा विश्वाससुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दर्शविला. यावेळी मंचावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे,  माजी खासदार अनंत गुढे, रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची वलगाव आणि बडनेरा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यात आली.

उद्धवसेनेचा पंचसूत्री वचननामा, २५ लाखांपर्यंत मोफत उपचारमुंबई - महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्या जाहीरनाम्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र, शिवसेनेची काही वचने आहेत. ती सरकार आल्यानंतर पूर्ण केली जातील. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार, हे आमच्या जाहीरनाम्यात असल्याचे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.

‘मातोश्री’वर उद्धवसेनेचा पंचसूत्री वचननामा गुरुवारी प्रसिद्ध केल्यानंतर ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राला जी आश्वासने दिली होती ती आम्ही पूर्ण करून दाखवली आहेत. आताही जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो आणि जे बोलतो ते आम्ही करतो. राज्यातील बेरोजगारी दूर करणे, भूमिपुत्रांना नोकरी देणार आहोत.

वचननाम्यात काय?- प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर-गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार- प्रत्येक पोलिस ठाण्याबरोबर स्वतंत्र महिला पोलीस ठाणे सुरु करणार-प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट-जात, पात, धर्म, पंथ न पहाता महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण-सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना -जातनिहाय जनगणना करणार.-धारावीकरांना उद्योगांच्या सोयींसह राहते घर देणार.-रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र उभारणार-बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करणार.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी