शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:20 IST

भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा योग्य नसून ती अप्रासंगिकही असल्याचे म्हटलं आहे.

Ashok Chavan on Batenge Toh Katenge : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे विरोधकांकडून या घोषणेचा विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महायुतीच्या नेत्यांपर्यंत सर्वच जण अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत. असं असताना दुसरीकडे महायुतीचे काही नेते या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आता माजी मुख्यमंत्री आणि काही काळापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांनीही ही घोषणा विनाकारण देण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून महाराष्ट्रातील जनतेला ती आवडणार नाही, असे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. या घोषणेचा फारसा निवडणुकीशी संबंध नाही. निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते. पण ही विशिष्ट घोषणा चांगली नाही आणि ती लोकांना आवडेल असे मला वाटत नाही. व्यक्तिशः मी अशा घोषणांच्या विरोधात आहे कारण हे समाजासाठी अजिबात चांगले नाही. यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, हे पाहावे लागेल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

"मी माझ्या कामावर विश्वास ठेवतो. मी सेक्युलर आहे. मी भाजपमध्ये असलो तरीही मी सेक्युलर हिंदू आहे. मी मला हिंदुत्वावपासून वेगळं केलेलं नाही. पण मी सेक्युलर हिंदू आहे. संविधानही हेच सांगतं. भाजपमध्ये ही विचारधारा आहे की आम्ही हिंदू आहोत पण तरीही भाजपमध्ये सेक्युलर असूनही हिंदुत्व मानणारेही लोक आहेत," असंही अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, याआधी भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनीही 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणांची महाराष्ट्राला गरज नाही, असे म्हटलं आहे. "आपण एकाच पक्षाचे आहोत म्हणून मी त्याचे समर्थन करू शकत नाही. माझा विश्वास आहे की विकास हाच खरा मुद्दा आहे. या पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला मानणे हे नेत्याचे काम असते. असे विषय महाराष्ट्रात आणू नयेत. विविध राजकीय परिस्थिती असलेल्या यूपीच्या संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले होते. त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस