शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:20 IST

भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा योग्य नसून ती अप्रासंगिकही असल्याचे म्हटलं आहे.

Ashok Chavan on Batenge Toh Katenge : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे विरोधकांकडून या घोषणेचा विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महायुतीच्या नेत्यांपर्यंत सर्वच जण अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत. असं असताना दुसरीकडे महायुतीचे काही नेते या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आता माजी मुख्यमंत्री आणि काही काळापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांनीही ही घोषणा विनाकारण देण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून महाराष्ट्रातील जनतेला ती आवडणार नाही, असे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. या घोषणेचा फारसा निवडणुकीशी संबंध नाही. निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते. पण ही विशिष्ट घोषणा चांगली नाही आणि ती लोकांना आवडेल असे मला वाटत नाही. व्यक्तिशः मी अशा घोषणांच्या विरोधात आहे कारण हे समाजासाठी अजिबात चांगले नाही. यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, हे पाहावे लागेल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

"मी माझ्या कामावर विश्वास ठेवतो. मी सेक्युलर आहे. मी भाजपमध्ये असलो तरीही मी सेक्युलर हिंदू आहे. मी मला हिंदुत्वावपासून वेगळं केलेलं नाही. पण मी सेक्युलर हिंदू आहे. संविधानही हेच सांगतं. भाजपमध्ये ही विचारधारा आहे की आम्ही हिंदू आहोत पण तरीही भाजपमध्ये सेक्युलर असूनही हिंदुत्व मानणारेही लोक आहेत," असंही अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, याआधी भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनीही 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणांची महाराष्ट्राला गरज नाही, असे म्हटलं आहे. "आपण एकाच पक्षाचे आहोत म्हणून मी त्याचे समर्थन करू शकत नाही. माझा विश्वास आहे की विकास हाच खरा मुद्दा आहे. या पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला मानणे हे नेत्याचे काम असते. असे विषय महाराष्ट्रात आणू नयेत. विविध राजकीय परिस्थिती असलेल्या यूपीच्या संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले होते. त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस