शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:20 IST

भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा योग्य नसून ती अप्रासंगिकही असल्याचे म्हटलं आहे.

Ashok Chavan on Batenge Toh Katenge : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे विरोधकांकडून या घोषणेचा विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महायुतीच्या नेत्यांपर्यंत सर्वच जण अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत. असं असताना दुसरीकडे महायुतीचे काही नेते या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आता माजी मुख्यमंत्री आणि काही काळापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांनीही ही घोषणा विनाकारण देण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून महाराष्ट्रातील जनतेला ती आवडणार नाही, असे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. या घोषणेचा फारसा निवडणुकीशी संबंध नाही. निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते. पण ही विशिष्ट घोषणा चांगली नाही आणि ती लोकांना आवडेल असे मला वाटत नाही. व्यक्तिशः मी अशा घोषणांच्या विरोधात आहे कारण हे समाजासाठी अजिबात चांगले नाही. यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, हे पाहावे लागेल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

"मी माझ्या कामावर विश्वास ठेवतो. मी सेक्युलर आहे. मी भाजपमध्ये असलो तरीही मी सेक्युलर हिंदू आहे. मी मला हिंदुत्वावपासून वेगळं केलेलं नाही. पण मी सेक्युलर हिंदू आहे. संविधानही हेच सांगतं. भाजपमध्ये ही विचारधारा आहे की आम्ही हिंदू आहोत पण तरीही भाजपमध्ये सेक्युलर असूनही हिंदुत्व मानणारेही लोक आहेत," असंही अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, याआधी भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनीही 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणांची महाराष्ट्राला गरज नाही, असे म्हटलं आहे. "आपण एकाच पक्षाचे आहोत म्हणून मी त्याचे समर्थन करू शकत नाही. माझा विश्वास आहे की विकास हाच खरा मुद्दा आहे. या पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला मानणे हे नेत्याचे काम असते. असे विषय महाराष्ट्रात आणू नयेत. विविध राजकीय परिस्थिती असलेल्या यूपीच्या संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले होते. त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस