शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्रातील शेती लहरी हवामानाच्या ‘हॉटस्पॉट’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 20:02 IST

हवेचे प्रदूषण, भुजल पातळी खालावणे, मृदा संधारण आणि पीक फेरपालट न केल्यामुळे सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या दुष्परिणांमध्ये महाराष्ट्र ‘हॉट स्पॉट’वर आहे. 

ठळक मुद्देभुजल पातळीच्या वाढीकरिता हवे योग्य व्यवस्थापन ड्ब्ल्यु टी ओ संस्थेकडून विविध निष्कर्ष तापमान आणि पर्जन्यमान्यातील बदलांचा सर्वाधिक धोका महाराष्ट्राने नोव्हेंबरमध्ये १३१ तालुक्यांमध्ये दुष्काळ केला जाहीर नागरिकांच्या आणि युवकांच्या मोहिमा, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वाची ठरणार

पुणे : सातत्याने वाढणाऱ्या तापमानाचा परिणाम मृदा संधारणावर होत आहे. केवळ पाण्याच्या संवर्धनाबरोबरच मृदा संधारणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वाढते प्रदूषण त्यामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. या सगळ्याचा परिणाम पिकांवर होत आहे. हवेचे प्रदूषण, भुजल पातळी खालावणे, मृदा संधारण आणि पीक फेरपालट न केल्यामुळे सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या दुष्परिणांमध्ये महाराष्ट्र ‘हॉट स्पॉट’वर आहे.  वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या हवामान बदलांचा अभ्यास करुन शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे काम करणाऱ्या संस्थेने नुकतेच २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने मांडण्यात आलेल्या निष्कर्षांची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेला सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त क्रिस्पिनो लोबो, संचालक संदीप जाधव उपस्थित होते. जाधव म्हणाले, भारत हवामान बदलासाठी हॉटस्पॉट आहे. येथील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या निसर्गावर आधारित आहे. त्यामुळे याठिकाणी तापमान आणि पर्जन्यमान्यातील बदलांचा सर्वाधिक धोका संभवतो. फक्त पावसावर आधारित शेती करणाऱ्या भागात महाराष्ट्राच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक भाग व्यापलेला आहे. मात्र अशा ठिकाणी चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राने नोव्हेंबरमध्ये १३१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला तर कर्नाटकने १०० पैकी ७२ तालुक्यांत दुष्काळाचा अहवाल दिला.  लोबो यांनी सांगितले, सध्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेतीकडे वाटचाल करण्यासाठी सुधारित जलवापर पध्दती, जल अंदाजपत्रक तयार करणे, पूर्णपणे सेंद्रिय किंवा मर्यादित स्वरुपातील रासायनिक खतांचा वापर, माती आरोग्याची तपासणी आणि जमीन निकृष्ट होण्यावर नियंत्रण करण्याकरिता समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. तसेच वातावरणातील बदलाच्या परिस्थितीत नवीन आव्हानाना सामोरे जाण्याकरिता विद्यमान विस्तार सेवांची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे आहे. प्रगतीच्या महत्वाकांक्षा मर्यादित ठेवण्याकरिता अधिक विकसित राष्ट्रांमधुन नागरिकांच्या आणि युवकांच्या मोहिमा, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 

काय करावे लागेल? - लहान शेतकऱ्यांनी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याकरिता आणि शेती उत्पन्न दुप्पट करण्यासाठी समुह / गट शेती आणि शेतकरी उत्पादक संस्थांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. - स्थानिक परिस्थिती आणि वेळेनुसार विस्तृत कृषी हवामानविषयक सल्ल्यांचा प्रसार करणे व स्वयंचलित निर्णय समर्थन प्रणालीचा वापर करुन असे सल्ले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचिणे गरजेचे आहे.- पावसाचा लहरीपणा आणि भुगर्भातील उथळ जलाशयांमध्ये झिरपणारा मर्यादित पाणीसाठा अशा भागातील पाण्याचे स्त्रोत व्यवस्थापित करणे फार महत्वाचे आहे.  - वातावरणातील बदलांच्या आव्हानांना विशेषत: भुजल वापर, जमिनीचा वापर, जलसंसाधन, शेती आणि हवामान, वित्त क्षेत्र, यांना एकत्रित आणि परिणामकारक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीweatherहवामान