शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

महाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी

By admin | Updated: August 5, 2016 01:30 IST

महाड पोलदपूर दरम्यान महापूराच्या पाण्यात ब्रिटीशकालीन पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल

भारत चव्हाण,

मुंबई- महाड पोलदपूर दरम्यान महापूराच्या पाण्यात ब्रिटीशकालीन पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. याच दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तीन तज्ज्ञांची एक समिती गठीत केली असून या समितीने कारणांचा शोध घेण्याचे काम सुरु केले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.बुधवारी न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती, परंतु सरकारने ती मान्य केली नव्हती. गुरुवारी मात्र प्रश्नोत्तराचा तास संपताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय सभागृहात पुन्हा आणला. महाडजवळील दुर्घटनेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे, कारण ही दुर्घटना केवळ मंत्री, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घडलेली आहे. त्याची जबाबदारी निश्चित होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी विखे पाटील यांनी केली. न्यायालयीन चौकशीची मागणी योग्य असून ती मान्य करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, बुधवारीच राज्य सरकारने आयआयटी संस्थेचे प्रा. ज्योतिप्रकाश, आर.एच.जहॉँगिर व व्ही. एस.वासुदेव अशा तीन तज्ज्ञांची समिती नेमली आहे. सरकारने राज्यातील सर्वच ब्रिटीशकालीन जुन्या पूलांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचा निर्णय घेतला असून तसे निर्देश विभागीय बांधकाम अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र ही प्रक्रिया बराच वेळ चालणार असल्याने तातडीने प्राथमिक आॅडीट करून हे पूल वाहतुकीस योग्य आहेत की नाही याची माहितीघेण्यात येईल. >तर दुर्घटना टळली असती : अजित पवारस्थगन प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना अजित पवार यांनी महाड जवळील ब्रिटीशकालीन पूल धोकादायक बनला असल्याचा विषय भारतकुमार गागावले यांनी ३० जुलै २०१५ रोजी विधानसभेत उपस्थित केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा पूल सक्षम असून वाहतुकीस योग्य असल्याचे सांगितले होते. हा मंत्री, अधिकारी याचा दुर्लक्षपणा आहे.त्यामुळे संबंधित अधिकारी मंत्र्यांना शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असे पवार म्हणाले. स्ट्रक्चरल आॅडीटचा मुद्दा पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांनीही उचलून धरला.>कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पूल तसेच आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील पूलही धोकादायक बनल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. शिवाजी पूलाला पर्यायी पूल तयार केला जात असून त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी सूृचना क्षीरसागर यांनी केली.