शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पूरग्रस्तांसाठी महाहौसिंग नव्याने घरे बांधणार : राजेंद्र मिरगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 13:13 IST

कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणार दिलासा

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यात २६ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट - राजेंद्र मिरगणेग्रामीण भागातही स्मार्ट व्हिलेजची संकल्पना साकारणार - राजेंद्र मिरगणेगृहनिर्माणाला गती मिळावी या उद्देशाने डिसेंबर २०१८ मध्ये शासनाने महाहौसिंगची स्थापना केली - राजेंद्र मिरगणे

बार्शी : कोल्हापूर, सांगली, सातारा येथे झालेल्या महापुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अशा घरांच्या नुकसानीचा आढावा घेऊन बेघरांसाठी नव्याने घरांची उभारणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सोपवली आहे. महाहौसिंंगच्या माध्यमातून हे आवाहन स्वीकारून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री राजेंद्र मिरगणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.

मिरगणे यांच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा जाहीर केल्यानंतर प्रथमच बार्शीत आल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यात २६ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करताना गृहनिर्माणाला गती मिळावी या उद्देशाने डिसेंबर २०१८ मध्ये शासनाने महाहौसिंगची स्थापना केली. या महामंडळाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून, सहअध्यक्षपद माझ्याकडे सोपवले आहे. आता शहरी भागाच्या धर्तीवर स्मार्ट सिटीचा नियोजनबद्ध आराखडा मांडून वसाहती उभारल्या जात आहेत, त्याप्रमाणेच ग्रामीण भागातही स्मार्ट व्हिलेजची संकल्पना साकारणार आहे. 

नुकतेच शासनाने सर्वांना परवडेल अशा किमतीत घरे बांधण्याच्या आधुनिक स्थापत्य तंत्रज्ञान बाबतचा अभ्यास लक्षात घेऊन महापूरग्रस्त भागात विस्थापित झालेल्या बेघरांना घरे बांधून देण्याचीही धुरा सोपविली आहे. त्या भागात जाऊन त्याची प्रत्यक्ष जाऊन पहाणी घराच्या नुकसानीची ग्राऊंड पातळीवर करणार. त्यानंतर घरे उभारण्याची संख्यात्मक आवश्यकता व अंदाजपत्रक याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. लवकरच पोलीस होमगार्ड, अन्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी समर्पित वसाहती उभारण्याचे पायलट प्रोजेक्ट राज्यात कार्यान्वित होतील. त्यातील तीनला सोलापुरात मंजुरी मिळाली असून, वर्षअखेरीस १ लाख घरांना मंजुरी मिळणार असल्याचे राजेंद्र मिरगणे यांनी माहिती दिली. यावेळी गृहनिर्माण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते़

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSatara Floodसातारा पूर