शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

पूरग्रस्तांसाठी महाहौसिंग नव्याने घरे बांधणार : राजेंद्र मिरगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 13:13 IST

कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणार दिलासा

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यात २६ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट - राजेंद्र मिरगणेग्रामीण भागातही स्मार्ट व्हिलेजची संकल्पना साकारणार - राजेंद्र मिरगणेगृहनिर्माणाला गती मिळावी या उद्देशाने डिसेंबर २०१८ मध्ये शासनाने महाहौसिंगची स्थापना केली - राजेंद्र मिरगणे

बार्शी : कोल्हापूर, सांगली, सातारा येथे झालेल्या महापुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अशा घरांच्या नुकसानीचा आढावा घेऊन बेघरांसाठी नव्याने घरांची उभारणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सोपवली आहे. महाहौसिंंगच्या माध्यमातून हे आवाहन स्वीकारून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री राजेंद्र मिरगणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.

मिरगणे यांच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा जाहीर केल्यानंतर प्रथमच बार्शीत आल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यात २६ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करताना गृहनिर्माणाला गती मिळावी या उद्देशाने डिसेंबर २०१८ मध्ये शासनाने महाहौसिंगची स्थापना केली. या महामंडळाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून, सहअध्यक्षपद माझ्याकडे सोपवले आहे. आता शहरी भागाच्या धर्तीवर स्मार्ट सिटीचा नियोजनबद्ध आराखडा मांडून वसाहती उभारल्या जात आहेत, त्याप्रमाणेच ग्रामीण भागातही स्मार्ट व्हिलेजची संकल्पना साकारणार आहे. 

नुकतेच शासनाने सर्वांना परवडेल अशा किमतीत घरे बांधण्याच्या आधुनिक स्थापत्य तंत्रज्ञान बाबतचा अभ्यास लक्षात घेऊन महापूरग्रस्त भागात विस्थापित झालेल्या बेघरांना घरे बांधून देण्याचीही धुरा सोपविली आहे. त्या भागात जाऊन त्याची प्रत्यक्ष जाऊन पहाणी घराच्या नुकसानीची ग्राऊंड पातळीवर करणार. त्यानंतर घरे उभारण्याची संख्यात्मक आवश्यकता व अंदाजपत्रक याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. लवकरच पोलीस होमगार्ड, अन्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी समर्पित वसाहती उभारण्याचे पायलट प्रोजेक्ट राज्यात कार्यान्वित होतील. त्यातील तीनला सोलापुरात मंजुरी मिळाली असून, वर्षअखेरीस १ लाख घरांना मंजुरी मिळणार असल्याचे राजेंद्र मिरगणे यांनी माहिती दिली. यावेळी गृहनिर्माण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते़

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSatara Floodसातारा पूर