शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

निवडणुकीला कांद्याची फोडणी, विरोधकांनी उचलला मुद्दा; शरद पवारांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 09:12 IST

माढा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथील प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांना भेदभावाची वागणूक देत असल्याचा आरोपही केला.

करमाळा (सोलापूर) : केंद्र सरकारने गुजरातमधील पाढऱ्या कांद्यावरील निर्यांतबंदी उठवल्याचा मुद्दा आता महाराष्ट्रात प्रचाराचा मुद्दा बनला आहे. विरोधी पक्षांनी यावरून केंद्र सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. देशभरात कांदा निर्यातबंदी असताना मोदी सरकारने ऐन निवडणुकीत गुजरातमधील दोन हजार मे.टन पांढरा कांदा निर्यातीस मंजुरी देऊन महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यावर अन्याय केला आहे, अशी टीका खासदार शरद पवार केली.

माढा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथील प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांना भेदभावाची वागणूक देत असल्याचा आरोपही केला.  महाराष्ट्रातील निवडणुकीचे दोन टप्पे आता पार पडले आहेत. उरलेल्या तीन टप्प्यातील काही भाग हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे. त्यामुळे या तीन टप्प्यांमध्ये विरोधकांसाठी कांदानिर्यात हा कळीचा मुद्दा असणार आहे. सत्ताधारी यावर कसे उत्तर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हा तर महाराष्ट्रावर अन्यायमहाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी असताना गुजरातमधील कांद्याला परदेशात पाठवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय करणारा निर्णय आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे खरे रूप समोर आले असल्याची टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत केली.

गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या २५ टक्केही कांदा पिकत नाही आणि तिथल्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली जाते. महाराष्ट्रातील आमच्या शेतकऱ्यांच्या कांदा असाच सडून जात आहे; पण निर्यातबंदी उठवली जात नाही. एकीकडे महाराष्ट्रातील जनतेची मते मिळवण्यासाठी रोज सभा घ्यायच्या, गोड बोलून त्यांना आकर्षित करायचे.

त्यांच्या अडचणींकडे मात्र कानाडोळा करायचा हेच भाजपचे आजपर्यंतचे धोरण राहिले आहे. या सावत्र वागणुकीचे उत्तर शेतकरी मतपेटीतून नक्की देईल, असेही जयंत पाटील म्हणाले. 

कांदा निर्यातबंदीचा प्रश्न अनेक महिने चिघळलेलाकेंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यापासून हा प्रश्न अनेक महिने चिघळलेला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापारी कांदा खरेदीस नकार देत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरीही हैराण आहेत. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत दुजाभाव कशासाठी?महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी असा काय गुन्हा केला आहे की, मोदी सरकारकडून त्यांच्यासोबत दुजाभाव सुरू आहे? गुजरातमधील शेतकरी तुपाशी आणि महाराष्ट्रातील शेतकरी मात्र उपाशी... हाच अन्याय गेली दहा वर्षे सुरू आहे.    - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते 

टॅग्स :madha-pcमाढाSharad Pawarशरद पवारonionकांदाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४