शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 10:18 IST

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबाद केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उफाळून आलाय.

Navneet Rana : भाजपच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. हैदराबादमध्ये लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेल्या नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका विधानावरून ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली. या टीकेनंतर असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर  काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं आहे, असं विधान केल्याने नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. यावर बोलताना नवनीत राणा यांनी मी काही गुन्हा दाखल होण्याला घाबरणारी नाही, असं म्हटलं आहे. यासोबत असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा असेही राणा म्हणाल्या.

अमरावतीमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर नवनीत राणा प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. गुरुवारी नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्या विधानाचा हवाला देत ओवैसी बंधूंवर टीकास्त्र सोडलं. “छोट्या भावाने १५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला करण्यास सांगितले होते. मी आज त्यांना सांगू इच्छिते, छोट्या तुला १५ मिनिटे लागत होती. पण आम्हाला फक्त १५ सेकंद लागणार आहेत. जर १५ सेकंदासाठी पोलिसांना बाजूला केले, तर छोट्या भावाला समजणारही नाही, कुठून आले आणि कुठे गेले.” अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती. 

त्यानंतर जहिराबादमध्ये भाजपा उमेदवार बी. बी पाटील यांच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी आणखी एक विधान केलं. मला इथल्या मतदारांना एक गोष्ट सांगायची आहे. काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं आहे. या गोष्टीला विरोध करण्यासाठीच मी इथे आले आहे, असं राणा यांनी म्हटलं. त्यानंतर  निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून तेलंगणामध्ये राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एबीपी माझासोबत बोलताना नवनीत राणा यांनी ओवैसी यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवं असं म्हटलं आहे.

आमच्या संस्कृतीनुसार आम्ही काम करतो - नवनीत राणा

"अशा गुन्ह्यांना नवनीत राणा मोजत नाही.  ज्या देशामध्ये सव्वाशे कोटींपेक्षा जास्त आमची लोकसंख्या आहे तिथे १५ कोटी असलेले लोक खुलेआमपणे धमकी देतात १५ मिनिटे पोलिसांना बाजूला करा. आम्ही १५ मिनिटांत पाहून घेऊ कोणामध्ये दम आहे. उघडपणे धमकी देणाऱ्या लोकांना उत्तर तर द्यावेच लागेल. ते उत्तर मी दिलं आणि त्यांनी १५ मिनिटे मागितली होती मी १५ सेकंद मागितले आहेत. सव्वाशे कोटी लोकसंख्या असताना घाबरायला आम्ही बांगड्या थोडी घातल्या आहेत. आमचे संस्कार, संस्कृती आमच्या पाठीशी आहे. आम्ही त्यानुसार काम करतो. पण या लोकांनी जर मंचावर येऊन दम देत असतील तर आम्ही काय बांगड्या घालून बसलेलो नाही. माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर ओवेसींवर १०० टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी काही गुन्हा दाखल होण्याला घाबरणारी नाही. ज्या हिंदुस्तानमध्ये आम्ही राहत आहोत तिथे हे लोक आम्हाला उघडपणे धमकी देत आहेत. याच्यासाठी बोलावच लागेल. उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत," असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४navneet kaur ranaनवनीत कौर राणाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाTelanganaतेलंगणा