शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:08 IST

Loksabha Election - पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली असा घणाघात ठाकरेंनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीतून भाजपावर केला. 

मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) देशाचं संविधान बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार हवेत, लोकसभेत कायदा बनवला तर कोर्ट काय करणार, त्यामुळे आता जनतेनं अबकी बार तडीपार असा नारा दिला आहे. अयोग्य ते काढा, इंडिया आघाडीनं एक एक पाऊल ठरवली आहे. हुकुमशाहीला हरवावेच लागेल नाहीतर देशाचे भवितव्य अंधारात येईल. त्याकाळी परकियांची गुलामगिरी होती, आता स्व‍कीयांची येईल. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच अशी घोषणा टिळकांनी दिली होती. आता स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी टिकवणारच ही आजची घोषणा असली पाहिजे असा घणाघात करत सत्तेच आल्यानंतर कुठल्या ५ गोष्टी करणार यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची लूट थांबवली पाहिजे, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग आपल्याला परत आणावेच लागतील. आर्थिक केंद्र परत आणायचं, मी मुख्यमंत्री असताना २ लाख कर्ज माफी दिली होती. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन हमीभाव मिळाला पाहिजे. माझ्या काळात हमीभाव मिळत होता मग आता का नाही. GST च्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद थांबवला पाहिजे. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. ती थांबवणार, शेतकऱ्यांना खते, बियाणे, अवजारे यासारख्या सगळ्या गोष्टीवरील जीएसटी मला काढायचा आहे. शेतकऱ्यांना गोदाम, शीतगृहे उपलब्ध करून द्यायला हवीत. मार्केट उपलब्ध करून द्यायला हवेत. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल राज्य आणि केंद्राच्या मदतीने करायची आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे, युवकांना रोजगार द्यायचा आहे. महाराष्ट्राचं वैभव परत आणायचं आहे. महाराष्ट्र हे चित्र बदलू शकतात. राज्याने महाविकास आघाडीचे ४८ खासदार दिले तर सरकार बदलेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली. मणिपूर १ वर्ष घुमसतंय ते थांबवले का नाही. मतदानाच्या दिवशी हिंसाचार झाला. ज्या महिलांची धिंड काढली गेली. तरीही इतकी दडपशाही, बातम्याही बाहेर येऊ देत नाही. अत्याचार आजही सुरू आहे. अजूनही मणिपूर अशांत आहे त्याबद्दल कुणात संवेदना नाही. उद्योगधंदे मी येऊ देणार नाही, तुम्हाला लोकांची पोट भरली म्हणजे गुलाम केल्यासारखे आहे. तुम्हाला रोज खायचे असेल तर माझ्या दारासमोर भीक मागावीच लागेल. सगळ्यांना आपलं गुलाम करून ठेवायचे. त्यानंतर तुमची माझ्याविरोधात बोलण्याची बिशाद काय अशी अवस्था सरकारने करून ठेवलीय. मोदींना देशाला दिशा आणि कार्यक्रम देता आला नाही असा आरोप ठाकरेंनी केला. 

दरम्यान, अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती तिला तुम्ही नकली म्हणता आणि नकलींना मांडीवर घेतलं आहे. भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा अशी अवस्था आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणं यालाच हुकुमशाही म्हणतात. लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगले काम करताना त्यांना जेलमध्ये टाकले. हेमंत सोरेनसारख्या आदिवासी नेत्याने भाजपाने धोबीपछाड केले. त्यांना तुम्ही हरवू शकत नाही. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, यांना तुम्ही पक्षात घेऊन मानाचं स्थान देतायेत. प्रज्ज्वल रेवन्नावर बलात्काराचे आरोप तो पळून जातो, तुम्ही माझ्या शिवसैनिकांना जेलमध्ये टाकता. संजय राऊतांचा गुन्हा नसताना त्यांना तुरुंगात टाकता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धुतराष्ट्र नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

...म्हणून यांना संविधान बदलायचंय

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांनी देशाचं संविधान निर्माण केले. ज्या बाबासाहेबांना त्यावेळी गोष्टी भेडसावत होत्या. त्यांच्याविरोधात बाबासाहेबांनी लढा दिला. बुरसटलेल्या गोमूत्रधारींना माझ्यापेक्षा बुद्धीमान माणूस हा कसा, वर्णद्वेष हा प्राचीन काळापासून सुरू आहे. दलित कुटुंबात जन्मलेला माणूस इतका बुद्धीमान कसा असू शकतो. त्याला दैवत, महामानव मानतात. त्यांनी लिहिलेले संविधान आम्ही पाळायचे, हा आमचा अपमान हे त्यांना वाटतंय, त्यामुळे या लोकांना संविधान बदलायचे आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४