शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:08 IST

Loksabha Election - पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली असा घणाघात ठाकरेंनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीतून भाजपावर केला. 

मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) देशाचं संविधान बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार हवेत, लोकसभेत कायदा बनवला तर कोर्ट काय करणार, त्यामुळे आता जनतेनं अबकी बार तडीपार असा नारा दिला आहे. अयोग्य ते काढा, इंडिया आघाडीनं एक एक पाऊल ठरवली आहे. हुकुमशाहीला हरवावेच लागेल नाहीतर देशाचे भवितव्य अंधारात येईल. त्याकाळी परकियांची गुलामगिरी होती, आता स्व‍कीयांची येईल. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच अशी घोषणा टिळकांनी दिली होती. आता स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी टिकवणारच ही आजची घोषणा असली पाहिजे असा घणाघात करत सत्तेच आल्यानंतर कुठल्या ५ गोष्टी करणार यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची लूट थांबवली पाहिजे, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग आपल्याला परत आणावेच लागतील. आर्थिक केंद्र परत आणायचं, मी मुख्यमंत्री असताना २ लाख कर्ज माफी दिली होती. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन हमीभाव मिळाला पाहिजे. माझ्या काळात हमीभाव मिळत होता मग आता का नाही. GST च्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद थांबवला पाहिजे. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. ती थांबवणार, शेतकऱ्यांना खते, बियाणे, अवजारे यासारख्या सगळ्या गोष्टीवरील जीएसटी मला काढायचा आहे. शेतकऱ्यांना गोदाम, शीतगृहे उपलब्ध करून द्यायला हवीत. मार्केट उपलब्ध करून द्यायला हवेत. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल राज्य आणि केंद्राच्या मदतीने करायची आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे, युवकांना रोजगार द्यायचा आहे. महाराष्ट्राचं वैभव परत आणायचं आहे. महाराष्ट्र हे चित्र बदलू शकतात. राज्याने महाविकास आघाडीचे ४८ खासदार दिले तर सरकार बदलेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली. मणिपूर १ वर्ष घुमसतंय ते थांबवले का नाही. मतदानाच्या दिवशी हिंसाचार झाला. ज्या महिलांची धिंड काढली गेली. तरीही इतकी दडपशाही, बातम्याही बाहेर येऊ देत नाही. अत्याचार आजही सुरू आहे. अजूनही मणिपूर अशांत आहे त्याबद्दल कुणात संवेदना नाही. उद्योगधंदे मी येऊ देणार नाही, तुम्हाला लोकांची पोट भरली म्हणजे गुलाम केल्यासारखे आहे. तुम्हाला रोज खायचे असेल तर माझ्या दारासमोर भीक मागावीच लागेल. सगळ्यांना आपलं गुलाम करून ठेवायचे. त्यानंतर तुमची माझ्याविरोधात बोलण्याची बिशाद काय अशी अवस्था सरकारने करून ठेवलीय. मोदींना देशाला दिशा आणि कार्यक्रम देता आला नाही असा आरोप ठाकरेंनी केला. 

दरम्यान, अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती तिला तुम्ही नकली म्हणता आणि नकलींना मांडीवर घेतलं आहे. भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा अशी अवस्था आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणं यालाच हुकुमशाही म्हणतात. लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगले काम करताना त्यांना जेलमध्ये टाकले. हेमंत सोरेनसारख्या आदिवासी नेत्याने भाजपाने धोबीपछाड केले. त्यांना तुम्ही हरवू शकत नाही. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, यांना तुम्ही पक्षात घेऊन मानाचं स्थान देतायेत. प्रज्ज्वल रेवन्नावर बलात्काराचे आरोप तो पळून जातो, तुम्ही माझ्या शिवसैनिकांना जेलमध्ये टाकता. संजय राऊतांचा गुन्हा नसताना त्यांना तुरुंगात टाकता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धुतराष्ट्र नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

...म्हणून यांना संविधान बदलायचंय

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांनी देशाचं संविधान निर्माण केले. ज्या बाबासाहेबांना त्यावेळी गोष्टी भेडसावत होत्या. त्यांच्याविरोधात बाबासाहेबांनी लढा दिला. बुरसटलेल्या गोमूत्रधारींना माझ्यापेक्षा बुद्धीमान माणूस हा कसा, वर्णद्वेष हा प्राचीन काळापासून सुरू आहे. दलित कुटुंबात जन्मलेला माणूस इतका बुद्धीमान कसा असू शकतो. त्याला दैवत, महामानव मानतात. त्यांनी लिहिलेले संविधान आम्ही पाळायचे, हा आमचा अपमान हे त्यांना वाटतंय, त्यामुळे या लोकांना संविधान बदलायचे आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४