शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:08 IST

Loksabha Election - पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली असा घणाघात ठाकरेंनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीतून भाजपावर केला. 

मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) देशाचं संविधान बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार हवेत, लोकसभेत कायदा बनवला तर कोर्ट काय करणार, त्यामुळे आता जनतेनं अबकी बार तडीपार असा नारा दिला आहे. अयोग्य ते काढा, इंडिया आघाडीनं एक एक पाऊल ठरवली आहे. हुकुमशाहीला हरवावेच लागेल नाहीतर देशाचे भवितव्य अंधारात येईल. त्याकाळी परकियांची गुलामगिरी होती, आता स्व‍कीयांची येईल. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच अशी घोषणा टिळकांनी दिली होती. आता स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी टिकवणारच ही आजची घोषणा असली पाहिजे असा घणाघात करत सत्तेच आल्यानंतर कुठल्या ५ गोष्टी करणार यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची लूट थांबवली पाहिजे, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग आपल्याला परत आणावेच लागतील. आर्थिक केंद्र परत आणायचं, मी मुख्यमंत्री असताना २ लाख कर्ज माफी दिली होती. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन हमीभाव मिळाला पाहिजे. माझ्या काळात हमीभाव मिळत होता मग आता का नाही. GST च्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद थांबवला पाहिजे. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. ती थांबवणार, शेतकऱ्यांना खते, बियाणे, अवजारे यासारख्या सगळ्या गोष्टीवरील जीएसटी मला काढायचा आहे. शेतकऱ्यांना गोदाम, शीतगृहे उपलब्ध करून द्यायला हवीत. मार्केट उपलब्ध करून द्यायला हवेत. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल राज्य आणि केंद्राच्या मदतीने करायची आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे, युवकांना रोजगार द्यायचा आहे. महाराष्ट्राचं वैभव परत आणायचं आहे. महाराष्ट्र हे चित्र बदलू शकतात. राज्याने महाविकास आघाडीचे ४८ खासदार दिले तर सरकार बदलेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली. मणिपूर १ वर्ष घुमसतंय ते थांबवले का नाही. मतदानाच्या दिवशी हिंसाचार झाला. ज्या महिलांची धिंड काढली गेली. तरीही इतकी दडपशाही, बातम्याही बाहेर येऊ देत नाही. अत्याचार आजही सुरू आहे. अजूनही मणिपूर अशांत आहे त्याबद्दल कुणात संवेदना नाही. उद्योगधंदे मी येऊ देणार नाही, तुम्हाला लोकांची पोट भरली म्हणजे गुलाम केल्यासारखे आहे. तुम्हाला रोज खायचे असेल तर माझ्या दारासमोर भीक मागावीच लागेल. सगळ्यांना आपलं गुलाम करून ठेवायचे. त्यानंतर तुमची माझ्याविरोधात बोलण्याची बिशाद काय अशी अवस्था सरकारने करून ठेवलीय. मोदींना देशाला दिशा आणि कार्यक्रम देता आला नाही असा आरोप ठाकरेंनी केला. 

दरम्यान, अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती तिला तुम्ही नकली म्हणता आणि नकलींना मांडीवर घेतलं आहे. भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा अशी अवस्था आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणं यालाच हुकुमशाही म्हणतात. लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगले काम करताना त्यांना जेलमध्ये टाकले. हेमंत सोरेनसारख्या आदिवासी नेत्याने भाजपाने धोबीपछाड केले. त्यांना तुम्ही हरवू शकत नाही. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, यांना तुम्ही पक्षात घेऊन मानाचं स्थान देतायेत. प्रज्ज्वल रेवन्नावर बलात्काराचे आरोप तो पळून जातो, तुम्ही माझ्या शिवसैनिकांना जेलमध्ये टाकता. संजय राऊतांचा गुन्हा नसताना त्यांना तुरुंगात टाकता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धुतराष्ट्र नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

...म्हणून यांना संविधान बदलायचंय

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांनी देशाचं संविधान निर्माण केले. ज्या बाबासाहेबांना त्यावेळी गोष्टी भेडसावत होत्या. त्यांच्याविरोधात बाबासाहेबांनी लढा दिला. बुरसटलेल्या गोमूत्रधारींना माझ्यापेक्षा बुद्धीमान माणूस हा कसा, वर्णद्वेष हा प्राचीन काळापासून सुरू आहे. दलित कुटुंबात जन्मलेला माणूस इतका बुद्धीमान कसा असू शकतो. त्याला दैवत, महामानव मानतात. त्यांनी लिहिलेले संविधान आम्ही पाळायचे, हा आमचा अपमान हे त्यांना वाटतंय, त्यामुळे या लोकांना संविधान बदलायचे आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४