शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:08 IST

Loksabha Election - पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली असा घणाघात ठाकरेंनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीतून भाजपावर केला. 

मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) देशाचं संविधान बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार हवेत, लोकसभेत कायदा बनवला तर कोर्ट काय करणार, त्यामुळे आता जनतेनं अबकी बार तडीपार असा नारा दिला आहे. अयोग्य ते काढा, इंडिया आघाडीनं एक एक पाऊल ठरवली आहे. हुकुमशाहीला हरवावेच लागेल नाहीतर देशाचे भवितव्य अंधारात येईल. त्याकाळी परकियांची गुलामगिरी होती, आता स्व‍कीयांची येईल. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच अशी घोषणा टिळकांनी दिली होती. आता स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी टिकवणारच ही आजची घोषणा असली पाहिजे असा घणाघात करत सत्तेच आल्यानंतर कुठल्या ५ गोष्टी करणार यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची लूट थांबवली पाहिजे, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग आपल्याला परत आणावेच लागतील. आर्थिक केंद्र परत आणायचं, मी मुख्यमंत्री असताना २ लाख कर्ज माफी दिली होती. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन हमीभाव मिळाला पाहिजे. माझ्या काळात हमीभाव मिळत होता मग आता का नाही. GST च्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद थांबवला पाहिजे. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. ती थांबवणार, शेतकऱ्यांना खते, बियाणे, अवजारे यासारख्या सगळ्या गोष्टीवरील जीएसटी मला काढायचा आहे. शेतकऱ्यांना गोदाम, शीतगृहे उपलब्ध करून द्यायला हवीत. मार्केट उपलब्ध करून द्यायला हवेत. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल राज्य आणि केंद्राच्या मदतीने करायची आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे, युवकांना रोजगार द्यायचा आहे. महाराष्ट्राचं वैभव परत आणायचं आहे. महाराष्ट्र हे चित्र बदलू शकतात. राज्याने महाविकास आघाडीचे ४८ खासदार दिले तर सरकार बदलेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, भ्रष्टाचारांना स्थान देणे, निवडणूक रोखे, जनतेशी फसवणूक ही ५ कामे भाजपाने केली. मणिपूर १ वर्ष घुमसतंय ते थांबवले का नाही. मतदानाच्या दिवशी हिंसाचार झाला. ज्या महिलांची धिंड काढली गेली. तरीही इतकी दडपशाही, बातम्याही बाहेर येऊ देत नाही. अत्याचार आजही सुरू आहे. अजूनही मणिपूर अशांत आहे त्याबद्दल कुणात संवेदना नाही. उद्योगधंदे मी येऊ देणार नाही, तुम्हाला लोकांची पोट भरली म्हणजे गुलाम केल्यासारखे आहे. तुम्हाला रोज खायचे असेल तर माझ्या दारासमोर भीक मागावीच लागेल. सगळ्यांना आपलं गुलाम करून ठेवायचे. त्यानंतर तुमची माझ्याविरोधात बोलण्याची बिशाद काय अशी अवस्था सरकारने करून ठेवलीय. मोदींना देशाला दिशा आणि कार्यक्रम देता आला नाही असा आरोप ठाकरेंनी केला. 

दरम्यान, अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती तिला तुम्ही नकली म्हणता आणि नकलींना मांडीवर घेतलं आहे. भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा अशी अवस्था आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणं यालाच हुकुमशाही म्हणतात. लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगले काम करताना त्यांना जेलमध्ये टाकले. हेमंत सोरेनसारख्या आदिवासी नेत्याने भाजपाने धोबीपछाड केले. त्यांना तुम्ही हरवू शकत नाही. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, यांना तुम्ही पक्षात घेऊन मानाचं स्थान देतायेत. प्रज्ज्वल रेवन्नावर बलात्काराचे आरोप तो पळून जातो, तुम्ही माझ्या शिवसैनिकांना जेलमध्ये टाकता. संजय राऊतांचा गुन्हा नसताना त्यांना तुरुंगात टाकता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धुतराष्ट्र नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

...म्हणून यांना संविधान बदलायचंय

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांनी देशाचं संविधान निर्माण केले. ज्या बाबासाहेबांना त्यावेळी गोष्टी भेडसावत होत्या. त्यांच्याविरोधात बाबासाहेबांनी लढा दिला. बुरसटलेल्या गोमूत्रधारींना माझ्यापेक्षा बुद्धीमान माणूस हा कसा, वर्णद्वेष हा प्राचीन काळापासून सुरू आहे. दलित कुटुंबात जन्मलेला माणूस इतका बुद्धीमान कसा असू शकतो. त्याला दैवत, महामानव मानतात. त्यांनी लिहिलेले संविधान आम्ही पाळायचे, हा आमचा अपमान हे त्यांना वाटतंय, त्यामुळे या लोकांना संविधान बदलायचे आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४