शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

Lokmat Sarpanch Awards 2018 : मेळघाटची वाघीण गंगाबाई जावरकर यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’(सुरक्षा) पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 14:22 IST

मेळघाटात कुपोषणासारख्या समस्यांचे मूळ अल्पवयीन मुलींच्या विवाहात आहे, असे लक्षात आल्यानंतर त्याविरोधात कंबर कसलेल्या अमरावती जिल्ह्यातील राणामालुर गावच्या सरपंच गंगाबाई राजमा जावरकर यांना ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (सुरक्षा) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी मेळघाटात कुपोषणासारख्या समस्यांचे मूळ अल्पवयीन मुलींच्या विवाहात आहे, असे लक्षात आल्यानंतर त्याविरोधात कंबर कसलेल्या अमरावती जिल्ह्यातील राणामालुर गावच्या सरपंच गंगाबाई राजमा जावरकर यांना ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (सुरक्षा) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गट - सुरक्षासरपंचाचे नाव - गंगाबाई राजमा जावरकरगाव - राणामालुरतालुका - धारणीजिल्हा - अमरावती

कुपोषणासारख्या समस्येवर लढा....

कुपोषण, दारिद्य्रग्रस्त मेळघाट परिसरातील राणामालुर हे लहानसे गाव! कुपोषणासारख्या समस्यांचे मूळ अल्पवयीन मुलींच्या विवाहात आहे, हे गावातील गंगाबाई राजमा जावरकर या मेळघाटच्या वाघिणीच्या लक्षात आले आणि तिने त्याविरोधात कंबर कसली. शासकीय यंत्रणांचे साहाय्य घेऊन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिच्या बेधडक स्वभावामुळे अनेक अल्पवयीन मुली आणि तरुणींची तिने शोषणापासून मुक्तता केली. तसेच महिलांचे बचत गट तयार करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले.स्वकर्तृत्वावर सरपंच पदापर्यंतचा टप्पा गाठल्यानंतर गंगाबाईने गावासाठी स्वप्नवत असणाऱ्या अत्याधुनिक शिक्षण, प्रगतीशील शेती या गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्याचे काम यशस्वीरित्या केले. तिच्या पुढाकाराने राणामालुरमध्ये डिजिटल शाळेचे स्वप्न साकार झाले. ई-शिक्षणासाठी शाळेला साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. टीव्ही, प्रोजेक्टर आदी माध्यमातून विविध शैक्षणिक संज्ञा शिकणे विद्यार्थ्यांना सोपे झाले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शाळेत शुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊन पटसंख्या वर्षभरात घसरली नाही.मुलींचा शाळेतील टक्का वाढविण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांमुळे, तसेच गंगाबार्इंचा आदर्श त्यांच्या पुढे असल्यामुळे गावातील शाळेत आज मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. तसेच प्रगतीशील, अत्याधुनिक शेतीसाठीही गंगाबाई यांनी प्रयत्न केले. ठिबक सिंचनाच्यामाध्यमातून जमीन ओलिताखाली आणली. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना प्रयोगशील महिला शेतकरी पुरस्कार, राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र